Get it on Google Play
Download on the App Store

‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’

१९०९
‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ असे नाथांनी सांगितले, तेव्हा भाऊसाहेब म्हणाले पोथीचे काम झाले, पोथी पुरे.
या वर्षी गोंदवल्याच्या आसपासच्या गावांत प्लेगने धुमाकूळ घातला. गोंदवल्यास श्रीराममंदिरात सप्ताह चालू असताना एके दिवशी संध्याकाळी श्रींना सपाटून ताप भरला. रात्री गल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या गाठी येऊन गळा खूप सुजला. गळ्याला गळपट्टा गुंडाळून दुलई पांघरुन श्री पलंगावर पडून होते. दहिवडीच्या मामलेदारास ही बातमी समजल्यावर तो श्रींना भेटायला आला.श्री खोलीतून बाहेर आले. श्रींनी फरगूळ घातला होता. मामलेदाराने श्रींना बघितले, तेव्हा गळ्याला गाठी नव्हत्या, तापही नव्हता. खाणे-पिणे, हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर मामलेदार निघून गेला. श्री खोलीत आले, गळा पूर्ववत सुजला, शरीर तापाने पुन्हा फणफणले, गळपट्टा व दुलई पांघरुन श्री कण्हू लागले. रामाच्या समोर सप्ताहाचे भजन सुरुच होते. दुसरे दिवशी दुपारी १२ वाजता गणपतराव दामले यांचा पहारा चालू असता. श्रीरामयांच्या डोळ्यातून अश्रू येत असलेले त्यांना स्पष्टपणे दिसले. लगेच झांजा थांबवून गणपतराव श्रींच्या खोलीत गेले व अश्रू येत असलेले त्यांनी श्रींना सांगितले. श्रींनी लगेच सोळ्याची लंगोटी घातली व हातातल्या रुमालाने रामरायाचे गाल हळुवार पुसू लागले. २०/२५ मिनिटे रामाच्या डोळ्यांतून पाणी येत होते.दुसर्‍या दिवशी रामाला दुधाचा अभिषेक केला. केसरीमध्ये ही बातमी छापून आली होती. पुढे काही दिवसांनी श्री रामासमोर भजन करीत होते. भजन रंगात आले. रामाकडे टक लावून श्री बघत असता रामाच्या हातातील बाण उडून श्रींच्या समोर येऊन पडला. बाण कपाळाला लावून श्री म्हणाले, " चार दिवस स्वारीच्या हात बाण देऊ नका." इकडे कागवाडला हनुमानाची मूर्ती भंग पावली म्हणून श्रींचे भक्त गणुबुवा यांनी श्रींना कागवाडला हनुमंताची स्थापना करायला बोलावले. श्री कबूल झाले. श्री मिरजेला आले व तेथे काही दिवस राहिले. तेवढ्यात गणुबुबांनी उपोषण सुरु केले व श्रींची वाट पाहू लागले. श्रींना उशीर होत आहे म्हणून त्यांनी विषप्राशन करण्याचे ठरविले. श्रींनी अंताजीपंतांना ताबडतोब कागवाडला धाडून " श्रीमहाराज आले" असे ओरडून सांगण्यास सांगितले. गणुबुवांनी विषाचा पेला खाली ठेवला व पंतांना मिठी मारली. श्री दुसर्‍या दिवशी कागवाडला आले. शके १८३१ (सन१९०९) सौम्यनाम संवत्सरी आषाद शुद्ध पंचमीला बुधवारी सकाळी श्रींनी मारुतीरायाची स्थापना केली. नंतर गणुबुवांच्या मंदिराभोवती झाडलोट करणार संताबाई महारीण हिने श्रींचे पाय धरले व म्हटले, "मायबाप मला सोडवा, आजपर्यंत पुष्कळ दु:ख भोगले, उरलेला भोग तीर्थप्रसादाने जाईल एवढी कृपा करा माझ्यावर." श्रींनी तिला आपल्या हाताने तीर्थप्रसाद दिला व लवकर घरी जाण्यास सांगितले. ती घरी गेली. शेजारी पाजारी लोकांचा तिने आनंदाने निरोप घेतला. घरी पोचल्यावर"राम राम राम" असे तीन वेळा म्हणून ती अंथरुणावर कलंडली व प्राण सोडला. श्रींनी तिच्या उत्तरकार्यासाठी पैसे दिले व तिच्या नावाने अन्नदान केले. गणुबुवांच्या राममंदिरासापाशी पाण्याची विहीर अतिशय खारट पाण्याची होती. बुवांनी श्रींना हे सांगितले. लगेच दुपारी एक गोसावी श्रींचा शोध करीत आला व म्हणाला, "काशीची गंगा रामेश्वरला नेत असताना शंकराचा द्दष्टांत झाला व ही गंगा ब्रह्मचैतन्यांना देण्याचा आदेश आला." श्रींनी बैराग्याचा मोठा आदर केला. "रामाने गंगा अनायासे पाठवून दिली. आपण ती विहिरीत टाकू" असे म्हणून सर्वांच्या अंगावर शिंपडून त्यांनी विहिरीत टाकली. विहिरीतील पाणी सर्वांना गोड वाटले. श्रींनी गोसाव्याला परत काशीस पाठवून दिले. एकदा जेवावयास अवकाश होता म्हणून श्रींनी भाऊसाहेब केतकर यांना नाथ भागवत वाचायला सांगितले. विठोबाच्या मंदिरात चार मंडळी बसली आणि भागवताचे वाचन सुरु झाले. दहा मिनिटे वाचून झाल्यावर" गुरुंची सांगितले, ते ऐकल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाले, " पोथीचे काम झले, पोथी आता पुरे." इतक्यात श्री आले व म्हणाले, " आजपोथीमध्ये काय निघाले  ? भाऊसाहेबांनी सांगितले. "नाथांनी सांगितले की गुरुची आज्ञा पाळावी." हे ऐकल्यावर आम्ही ती बंद केली. त्यावर श्री म्हणाले, "शाबास ही खरी पोथी, नाहीतर एखाद्याला पोथी वाचायला सांगितली म्हणजे तो पोथीची नुसती पारायणे करीत सुटतो आणि शेवटी आज्ञा केल्याबद्दल गुरुलाच पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येतो. बहुसंख्य शिष्य असलेच भेटतात."

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली