Get it on Google Play
Download on the App Store

"तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ."

१८६७
"तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला
आम्ही तुला घेऊन जाऊ."
श्री दुसरे दिवशी खातवळहून निघून डांबेवाडीस आपल्या चुलत बहिणीच्या घरी जाऊन दाराशीच ’जय जय रघुवीर समर्थ ’ अशी गर्गना केली व भीमाबाई, लवकर भिक्षा घाल" असे मोठयाने म्हणाले. भीमाबाई, बाहेर आली, पण तिने ओळखले नाही. तिच्याकडे पाहात श्री म्हणाले, "भीमाताई, तू तर सासरी अगदी तल्लीन होऊन गेलीस. माहेरच्या माणसांनासुद्धा तू विसरून गेलीस ना ?" श्रींचे हे शब्द कानावर पडल्यावर "गणू " म्हणून तिने हंबरडा फोडला व रडू लागली. आणि म्हणाली, "अरे गणू, तू एकाएकी निघून गेल्याने सर्वांना अतिशय दुःख झाले, तू बैरागी बनून साधलेस तरी काय ?" श्री तिला म्हणाले, "हे बघ, मी आता जातो, मी येथे येऊन गेलो ते कुणाला सांगू नकोस. मी पुन्हा लवकर परत येईन." असे म्हणून श्री तेथून लगेच निघून गेले. पुढे समर्थांच्या दर्शनाला सज्जनगडावर गेले. तेथे त्रिरात्र राहून पुढे रामेश्र्वराच्या दर्शनाकरिता निघाले. वाटेत तिरूपतीला व्यंकोबाचे दर्शन घेतले; पुढे खाली आल्यावर रस्त्याच्या कडेला एक रोगी भिकारी पडलेला त्यांना आढळला. त्याच्या जवळ जाऊन श्रींनी त्याला उठवून बसवले. त्याला खायला-प्यायला घातल्यावर "तुझी अशी अवस्था का झाली ?" म्हणून विचारले, त्यावर त्याने आपली हकिकत सांगितली. "तेलंगी मातॄभाषा असलेल्या इनामदाराचा मी एकुलता एक मुलगा. लाडात वाढल्यामुळे मला अनेक वाईट सवयी लागल्या. व्यसनांची भर पडली. मी ३० वर्षांचा असताना आई वारली. वडिलांनी दुसरी लग्न केले. नवीन आई माझा अत्यंत द्वेष करी व मी घराबाहेर पडावे असा तिचा सारखा प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवाने मला याच वेळी उपदंश झाला. माझे अंग सगळीकडे फुटले. मी फार आजारी पडलो. उठण्याची शक्तीही राहिली नाही. माझ्या नव्या आईने माझ्या वृद्ध गडयाला वश करून घेऊन मला अन्नात विष कालवून मारण्याचा कट रचला. लहानपणापासून श्रीरामेश्र्वरावर माझे प्रेम आहे, तर अंतकाळी श्रीरामेश्र्वराच्या चरणावर जाऊन पडावे असा विचार मनात आला व आपल्या वृद्ध गडयाला "रामेश्र्वराच्या वाटेवर मला नेऊन ठेव " असे सांगितले. त्याप्रमाणे मध्यरात्री गडयाने मला पाठीवर घेतले व रस्त्यावर आणून ठेवले." तेव्हापासून मी अखंड नामस्मरण करतो व यद्दच्छेने जे मिळेल त्यावर जगतो व रामेश्र्वराची वाट जितकी जाववेल तेवढी चालतो. या अवस्थेतही मी आनंदात आहे " त्याची ही हकिकत ऐकून श्रींना ब बरोबरच्या बैराग्यांना त्याचे कौतुक वाटले. श्रींनी त्याला सांगितले, "तू नामस्मरण करीत रहा रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." त्याप्रमाणे श्रींनी एक झोळी तयार केली. एका मोठया बांबूला अडकवली व पाळीपाळीने त्या सर्वांनी मजल दरमजल करीत रामेश्र्वराला नेऊन मंदिरात त्याला रामेश्र्वराचे दर्शन घडवले. त्याला इतका आनंद झाला की, तेलगू भाषेत एक सुंदर पद त्याच्या तोंडून बाहेर पडले व तेथेच त्याचा अंत झाला. श्रींनी त्याला वाळवंटावर आपल्या हाताने अग्नी दिला. रामेश्र्वराहून श्री पुन्हा थेट काशीला गेले, तेथे श्रीवरदराजाचे दर्शन घेतले. येताना एका चांदीच्या मोठया व्यापार्‍याची पत्नि वरदराजाची युक्ती साधली होती. इतकेच नव्हे तर तिला दिव्या द्दष्टीही प्राप्त झाली होती. सकाळी १० वाजता बाई घरात बसली असताना एकाएकी आपल्या गडयाला हाक मारून सांगितले बाहेर रस्त्यावर एक तरूण बैरागी चालला आहे त्याला नमस्कार करून घरी घेऊन ये." त्याप्रमाणे त्या गडयाने श्रींना पाहिले व आपल्या मालकिणीने बोलावले आहे असे सांगून त्यांना घरी आणले. श्रींना पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. श्री तिच्या पाया पडले, तिने आपल्या पतीलाही लगेच बोलावून घेतले. श्रींना पाहून त्यालाही समाधान वाटले. श्रींना पाहून त्या बाईला मातृप्रेमाचा जोरात उमाळा येई व तिच्या स्तनातून दूध वाहू लागले. श्री तेथे तीन दिवस राहिले व नंतर येहळेगावला जायला निघाले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली