Get it on Google Play
Download on the App Store

"भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला."

१८८५
"भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला."
श्री गोंदवल्यास असल्यावर अनेक गमती जमती चालत. एकदा अशीच मंडळी बसली असता श्री बर्‍याच वर्षांपूर्वी हल्याळ नावाच्या गावी गेले असता तेथे घडलेल्या हकिकतीस सुरुवात झाली. श्री एके दिवशी हल्याळात भिक्षा मागण्यासाठी निघाले व एका घरासमोर ’जयजय रघुवीर समर्थ ’ करून उभे राहिले. घरातील बाई भिक्षा घालण्यासाठी बाहेर आली त्यावेळी ती अत्यंत दुःखी दिसली. श्रींनी तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले. ती म्हणाली, "१५ दिवसांपासून माझ्या मुलाला ताप येत आहे, व तो उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत." असे म्हणून ती रडू लागली. श्रींनी तिला धीर दिला व स्वतः त्या मुलाजवळ गेले, मुलगा निपचित पडून राहिला होता. आईने त्याला हाक मारली तेव्हा त्याने डोळे उघडले आणि दीनपणे श्रींकडे पाहिले. श्रींनी लगेच त्याच्या हातात पाणी दिले व ’मी माझा ताप तुम्हाला दिला ’ असे म्हणून आपल्या हातावर पाणी सोडण्यास सांगितले. मुलाने तसे केल्यावर "बरे वाटेल, काळजी करू नये " असे आईला बोलून श्री निघून गेले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या परिचयाचे वासुदेव भट यांची गाठ पडली "दुपारी कोठे गेला होता ?" असे त्यांनी विचारल्यावर श्रींनी त्या मुलाची सर्व हकिकत सांगितली व "आता तो ताप मला भोगला पाहिजे, तापामध्ये तुम्ही माझी चौकशी करीत जा " असे त्यांना सांगितले. हे बोलणे होऊन काही दिवस गेल्यावर वासुदेव भट श्रींना म्हणाले, "गोसवीबुवा, त्या मुलाचा घेतलेला ताप तुम्ही केव्हा भोगणार ?" "अरे खरेच की, तो मुलगा जगला हे छान झाले. मी काय गोसावी, आता एक खोली मला रिकामी करून द्या." वासुदेव भटजींनी आपल्या घरातील एक खोली त्यांना दिली. श्री त्या खोलीत अकरा दिवसपर्यंत निजून होते. दार बंद करून घेतले होते तरी त्यांचे कण्हणे मधूनमधून ऐकू येई. बाराव्या दिवशी श्रींचा ताप उतरला. ते खोलीचे दार उघडून बाहेर आले. "भोग भोगून संपवला आहे, आता मऊ भात करून घाला. मी लवकर स्नान करून येतो." असे म्हणून श्री निघाले व लगेच विहिरीमध्ये उडी घेतली. वासुदेव भटजी विहिरीच्या काठावर बसले. अर्धा तास झाला तरी श्री वर येईनात, तेव्ह श्री खास बुडाले असे समजून भटजी रडू लागले. गावच्या पाटलाला ही माहिती सांगून त्यांना घेऊनच भटजी विहिरीपाशी आले; तो श्री काठावर बसलेले त्यांना आढळले. श्री कोणी सिद्धपुरुष आहेत अशी त्यांची खात्री झाली व लोकांची ये-जा सुरू झाली. श्री एके दिवशी कोणाला न कळवता हल्लयाळहून नाहीसे झाले. इतकी हकिकत सांगून होते, तोच कुरवळीचे दामोदरबुवा वासुदेव भटजींना घेऊनच श्रींच्या समोर हजर झाले. त्यांना पाहून श्री म्हणाले, "अरे अरे, वासुदेव भट, तुम्ही इकडे कुणीकडे ? तुम्ही किती थकला, आपल्याला भेटून फार वर्षे झाली, मी ज्याचा ताप घेतला तो मुलगा बरा आहे ना ?" हे शब्द ऐकल्याबरोबर भटजींन एकदम खूण पटली. त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. त्याचे असे झाले, दामोदरबुवा कुरवळीकर हल्लयाळला कीर्तनाच्या निमित्ताने गेले होते. कीर्तनात त्यांनी श्रींचे चरित्र वर्णन केले, हे ऐकून वासुदेव भटजींच्या मनात श्रींचे दर्शन घेऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा असे आले, म्हणून ते बुवांच्या बरोबर गोंदवल्यास येण्यास निघाले. आपल्या घरी राहिलेले ते हेच, ही कल्पना त्यांना नव्हती. आपल्या घरी राहिलेले सिद्धपुरुष ते हेच अशी ओखख पटल्यावर वासुदेव भटजींनी त्यांना एकदम साष्टांग नमस्कार घातला.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली