Get it on Google Play
Download on the App Store

मुचकुंदाची कथा

सूर्यवंशातील ईक्ष्वाकू राजाचा नातू मुचकुंद हा होय. तो अयोध्येस राज्य करीत असता, ब्रह्मदेवाच्या वरामुळे तारकासुर नावाचा राक्षस फार उत्पात घडवू लागला. बरीच वर्षे देवांनी त्याच्याशी युद्ध करूनही तो अजिंक्‍यच राहिला. मुचकुंद राजा हा रणविद्येत अत्यंत पारंगत असल्यामुळे त्याची मदत घ्यावी, या नारदांच्या सल्ल्यानुसार इंद्राने मुचकुंदाला अमरावतीस बोलावून घेतले. बराच काळ युद्ध होऊन शेवटी तारकासुराचा वध झाला. मुचकुंदाच्या उपकारातून मुक्त होण्यासाठी इंद्राने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने मोक्षप्राप्तीचे वरदान मागितले. पण इंद्राने सांगितले, "मोक्षदान देण्याची पात्रता आमच्याकडे नाही. द्वापारयुगात तुला श्रीकृष्ण भेटेल व तो तुला मोक्ष देईल. तोपर्यंत तू अयोध्येस सुखाने राज्य कर." पण आता पुन्हा जाऊन राज्य करण्याची मुचकुंदाची इच्छा नव्हती. त्याऐवजी श्रीकृष्ण भेटेपर्यंत आपणास गाढ निद्रा मिळावी, अशी मागणी मुचकुंदाने केली. त्यानुसार इंद्राने मुचकुंदास निद्रा दिली व जो तुला त्रास देऊन उठवील त्याचा नाश होईल, असे सांगितले.
पुढे कंसाला मारल्यामुळे जरासंध व श्रीकृष्ण यांच्यात वैर निर्माण झाले. सतरा वेळा मथुरेवर स्वारी करूनही जरासंधाचा पराभव झाला. पुन्हा एकदा जरासंध स्वारी करणार हे कळताच मथुरेची प्रजा श्रीकृष्णाकडे आली व आता हा अनर्थ थांबव, असे म्हणू लागली. इकडे जरासंधाने महापराक्रमी व ऋषींच्या वराचे अजिंक्‍य झालेल्या कालयवन राजाची मदत घेतली व कालयवन त्याच्या सैन्यासह मथुरेस गेला. श्रीकृष्णाने विश्‍वकर्म्यास बोलावून रात्रीतल्या रात्रीत द्वारकानगरी वसवली. एवढेच नव्हे तर मथुरेतील सर्व लोक, पशू, पक्षी, चीजवस्तू हे सर्व रात्रीच्या रात्री द्वारकेस नेऊन ठेवले.
रात्रभर श्रीकृष्ण एकटाच मथुरेत होता. सकाळी बाहेर पडून कालयवना समोरून तो जाऊ लागला. त्याला ओळखण्याच्या श्‍याम वर्ण, चार हातांत शंख, चक्र, गदा, कमळ व कमरेला पितांबर या जरासंधाने सांगितलेल्या खुणांवरून कालयवन त्याला धरण्याचा प्रयत्न करू लागला. श्रीकृष्ण एकटा व निःशस्त्र असल्याने कालयवनही तसाच त्याच्या मागून जाऊ लागला. होता होता ते सैन्यापासून बरेच दूर आले. तेव्हा श्रीकृष्ण एका गुहेत शिरला. तेथे आधीच झोपलेल्या मुचकुंदाच्या अंगावर आपला पीतांबर पांघरून श्रीकृष्ण निघून गेला. पीतांबरामुळे हाच श्रीकृष्ण असे वाटून कालयवनाने मुचकुंदाला जागे करण्यासाठी लाथ मारली. पण इंद्राच्या वरदानामुळे कालयवन जागीच भस्म होऊ गेला. मुचकुंदास जाग आल्यावर वराचे स्मरण झाले. त्याने श्रीकृष्णाचे स्तवन केल्याबरोबर त्याला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. कृष्णाने त्याला ,तू मोक्ष पावशील' असा वर दिला व नंतर श्रीकृष्ण तेथून द्वारकेस निघाला.

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
कर्णपुत्र वृषकेतूची कथा हयग्रीव अवतार बौद्धावतार हरिश्‍चंद्र वज्रनाभ राजाची कथा उषा-अनिरुद्ध विवाह यादवांच्या नाशाची कथा महाप्रलयाची कथा व्यासपुत्र शुकाची कथा मुचकुंदाची कथा उर्वशी व पुरुरवा ध्रुवाची कथा अयोध्येच्या धोब्याची कथा गाईचा महिमा दंडकारण्य उत्पत्ती कथा कर्णपुत्र वृषकेतूची कथा नृसिंह व वीरभद्र कर्णपुत्र वृषकेतूची कथा पाच पांडव व द्रौपदी कलंकी अवतार तपती आख्यान कृपाची जन्मकथा सरस्वतीची झाली नंदा रामभक्त राजा सुरथ श्‍वेतराजाचा उद्धार शिवभक्त वीरमणी रावणकथा विष्णूचे चक्र व गदा वैजयंतीमालेची कथा नंदीची कथा सांबाची सूर्योपासना प्रल्हाद आख्यान पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन शांतीचा मार्ग शंबरासुर वध पारिजात कथा श्रीवत्सलांच्छनाची कथा वृकासुराची कथा स्यमंतक मण्याची कथा १ स्यमंतक मण्याची कथा २ दशरथ कौसल्या विवाह त्रिशंकूची कथा भृगुपुत्र शुक्राची कथा कर्कटी राक्षसीची कथा जीवटाख्यान समुद्रमंथन व राहूची कथा रेणुकेचा जन्म रेणुका स्वयंवर सहस्रार्जुनाची कथा जयध्वजाचे आख्यान सौभरी चरित्र गरुडाचे गर्वहरण पराशर कथा श्रीमतीचे आख्यान कौशिकाचे वैष्णवगायन क्षुप व दधिचाची कथा श्रीरामांची सतीकडून परीक्षा शंखचूडाची कथा शिवांचे अवतार अवदशेची कथा कान्यकुब्ज नगरीची कथा भरताचे मागणे उर्वशी लोपामुद्रा सती सुकन्या नीलम आणि ऋता मैत्रेयी गार्गी सुभद्रा चित्रांगदा देवकी यशोदा