Get it on Google Play
Download on the App Store

हरिश्‍चंद्र

सूर्यवंशी राजा हरिश्‍चंद्र व राणी तारामती यांनी पुत्रप्राप्तीसाठी बरीच वर्षे वरुणदेवाची भक्ती केली. वरुणदेवाने प्रसन्न होऊन त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला; पण सोबत एक अट घातली. वरुण म्हणाला, "हरिश्‍चंद्रा, मी मागेन तेव्हा तुझा पुत्र तू मला परत दिला पाहिजे.'' अट विचित्र असली तरी पुत्रप्राप्तीसाठी व्याकूळ झालेल्या राजा-राणीने मी मान्य केली. यथावकाश तारामतीस मुलगा झाला. त्याचे नाव रोहिदास ठेवण्यात आले. रोहिदासाच्या जन्मानंतर बारा दिवसांनी वरुण त्याला परत मागू लागला. तेव्हा हरिश्‍चंद्र वरुणाची करुणा भाकून म्हणाला, "मुलगा फारच लहान आहे. कृपया त्याला दात आल्यावर घेऊन जा.'' राजाची विनंती मान्य करून वरुणदेव परत गेला व सोळा महिन्यांनी परत येऊन मुलाला मागू लागला. पुन्हा वरुणाला हात जोडून राजा म्हणाला, "मुलाचा व्रतबंध होईपर्यंत त्याला येथे राहू द्यावे.'' पुन्हा वरुण निघून गेला व आठ वर्षांनी रोहिदासाचा व्रतबंध झाल्यावर परत आला. तेव्हा राजा चिंतातुर झाला व आता मुलाचे संरक्षण कोणत्या युक्तीने करावे याचा विचार करू लागला. तो वरुणाला म्हणाला, "हे वरुणा, मुलाचा व्रतबंध झाला आहे हे खरे, पण त्याला सर्व विद्या, युद्धशास्त्र यात निपुण करून मग तुला द्यावे असे मला वाटते. तरी तू कृपा करून अजून आठ वर्षांनी ये.'' ही विनंतीही मान्य करून वरुण परत गेला व रोहिदास सोळा वर्षांचा झाल्यावर आपल्या दूतांसह परत आला. त्याने दूतांना रोहिदासाला आणण्यासाठी पाठवले. पण या वेळी रोहिदासाने स्वतःच त्यांना अडवले व आपल्या शक्तिसामर्थ्याने त्यांना कैद करून टाकले. ते वृत्त समजताच संतप्त होऊन वरुण स्वतः रोहिदासाला आणण्यासाठी हरिश्‍चंद्राकडे जाऊ लागला. परंतु वाटेत रोहिदासाने त्याला रोखले व आपले धनुष्य ओढून आपला भयंकर बाण वरुणावर रोखला. एवढ्यावरच न थांबता तो म्हणाला, "एक पाऊल पुढे टाकशील तर शिरच्छेद करीन.'' त्याचे ते तेज, आक्रमक पवित्रा पाहून वरुण जागीच थबकला. याला नेणे दुरापास्त आहे हे त्याला समजून चुकले व रोहिदासाला न घेताच निघून गेला.
याप्रमाणे राजा हरिश्‍चंद्राने वरुणाला वेळोवेळी आज, उद्या करीत, गोड बोलून कालहरण करून रोहिदासालाच स्वसंरक्षणासाठी सज्ज केले व शेवटी रोहिदासाला परत नेणे अशक्‍य आहे हे त्याच्याकडूनच कळवले. अशा रीतीने ते संकट हरिश्‍चंद्राने टाळले होते

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
कर्णपुत्र वृषकेतूची कथा हयग्रीव अवतार बौद्धावतार हरिश्‍चंद्र वज्रनाभ राजाची कथा उषा-अनिरुद्ध विवाह यादवांच्या नाशाची कथा महाप्रलयाची कथा व्यासपुत्र शुकाची कथा मुचकुंदाची कथा उर्वशी व पुरुरवा ध्रुवाची कथा अयोध्येच्या धोब्याची कथा गाईचा महिमा दंडकारण्य उत्पत्ती कथा कर्णपुत्र वृषकेतूची कथा नृसिंह व वीरभद्र कर्णपुत्र वृषकेतूची कथा पाच पांडव व द्रौपदी कलंकी अवतार तपती आख्यान कृपाची जन्मकथा सरस्वतीची झाली नंदा रामभक्त राजा सुरथ श्‍वेतराजाचा उद्धार शिवभक्त वीरमणी रावणकथा विष्णूचे चक्र व गदा वैजयंतीमालेची कथा नंदीची कथा सांबाची सूर्योपासना प्रल्हाद आख्यान पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन शांतीचा मार्ग शंबरासुर वध पारिजात कथा श्रीवत्सलांच्छनाची कथा वृकासुराची कथा स्यमंतक मण्याची कथा १ स्यमंतक मण्याची कथा २ दशरथ कौसल्या विवाह त्रिशंकूची कथा भृगुपुत्र शुक्राची कथा कर्कटी राक्षसीची कथा जीवटाख्यान समुद्रमंथन व राहूची कथा रेणुकेचा जन्म रेणुका स्वयंवर सहस्रार्जुनाची कथा जयध्वजाचे आख्यान सौभरी चरित्र गरुडाचे गर्वहरण पराशर कथा श्रीमतीचे आख्यान कौशिकाचे वैष्णवगायन क्षुप व दधिचाची कथा श्रीरामांची सतीकडून परीक्षा शंखचूडाची कथा शिवांचे अवतार अवदशेची कथा कान्यकुब्ज नगरीची कथा भरताचे मागणे उर्वशी लोपामुद्रा सती सुकन्या नीलम आणि ऋता मैत्रेयी गार्गी सुभद्रा चित्रांगदा देवकी यशोदा