Get it on Google Play
Download on the App Store

अरुंधती रॉय

या जागतिकीकरण विरोधी आंदोलनाच्या एक प्रवक्त्या आहेत आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचा विरोध करतात. भारताची आण्विक अस्त्रे, औद्योगिकीकरण आणि वेगाने विकासासाठीच्या धोरणांचा त्या निषेध करतात. ऑगस्ट २००८ मध्ये अरुंधती रॉय यांनी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आपले समर्थन व्यक्त केले. असे केल्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपा दोघांनीही त्यांची निंदा केली आणि आपले वक्तव्य परत घेण्यास सांगितले. ऑगस्ट २००६ मध्ये रॉय, नाओम चोमस्की, होवार्ड जिन्न आणि अशा अनेकांनी एका दास्तैवजावर स्वाक्षऱ्या केल्या ज्यामध्ये २००६ च्या लेबनान युद्धाला एक गुन्हा मानले आहे आणि इस्रायल ला राजकीय दहशत पसरवण्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे.