Get it on Google Play
Download on the App Store

लाँकडाऊन चिंतन ..!!!

या सगळ्या  सध्याच्या बिकट काळात बाकी आर्थिक सामाजिक बदल स्थितयंतरे होणारच त्यावर उपाय ही मिळतील पण त्याचा अंतर्भाव स्वतःत करण्यासाठी स्वतः लाच स्वय शिस्त लावायला हवी तरच त्या उपायांचा परिणाम हेच सत्य म्हणून" स्वःतत बदल  शिस्तीचा अमंल करणे हे प्रथम चिंतन"

एक वर्षापूर्वी याच काळात झालेले लाँकडाऊन आठवले .....

लाँकडाऊन मधे रामायण महाभारत मालिकाचे प्रक्षेपण चिंतनाचा एक दुवा च बनले होते  त्या काळात लोकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आपल्या या महाकाव्यात आहे एखाद्या नकळत जोडू पाहणारा प्रसंग मांडून बघू तुमच्या माझ्या शी असा विचार आला ....त्यातील पात्राला काही गोष्टींशी जोडून पाहिले ....कृष्णाची भूमिका तेव्हा अन् आत्ता तीच ......

कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो!

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

कृष्णाने उत्तर दिले:

"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

संदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले.

माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल... फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत

आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

तरीही

त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.
तक्रारी थांबव कर्णा!!!

असे प्रश्न आपल्या ला ही  जगताना  सध्या पडतातच कि..,.

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.जबाबदारीही टाळता येत नाही....!!

आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल चांगलाच विचार करणे योग्य असते ...तसाच तो इतरांनी करावा हाही विचार...मग हा अट्हास हट्ट कि तक्रार की अजून काही....वाईटातूनही चांगले शोधता यायला हवेच ..संकटाला संधी बनवली तर ....समस्या तर असतातच पण त्याहीपेक्षा मोठे व्हायला हवे...! प्रश्नाला उत्तरे मिळत राहतीलच पण सध्याचे काय ...तर केवळ चिंतनच हातात हेच फलित...सापडेल यात ही मार्ग ...हाच निष्कर्ष .!!

©मधुरा धायगुडे