Get it on Google Play
Download on the App Store

गर्भाधान संस्कार

आपल्या शास्त्राने मान्य केलेल्या संस्कारांत गर्भाधान पहिला आहे. गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर प्रथम कर्तव्याच्या स्वरुपात या संस्काराला मान्यता देण्यात आलेली आहे. गृहस्थ जीवनाचा प्रमुख उद्देश संतान उत्पत्ती हा आहे. उत्तम संतती होण्याची इच्छा बाळगणाऱ्या पती पत्नींनी गर्भाधानाच्या पूर्वी आपले तन आणि मनाच्या पवित्रतेसाठी हा संस्कार केला पाहिजे. दैवी जगताने बाळाची प्रगल्भता वाढावी आणि ब्रम्हदेवाच्या सृष्टीशी ते चांगल्या प्रकारे परिचित होऊन दीर्घ काळापर्यंत धर्म आणि मर्यादा यांचे रक्षण करत या लोकात आयुष्य उपभोगेल हाच या संस्काराचा मुख्य उद्देश आहे. विवाहानंतर करण्यात येणाऱ्या विविध पूजा आणि क्रिया याचाच हिस्सा आहेत...

गर्भाधान मुहूर्त
ज्या स्त्रीला ज्या दिवशी मासिक धर्म होईल, त्याच्या चार रात्रींच्या नंतर समान रात्री जेव्हा शुभ ग्रह केंद्र (१,४,७,१०) तथा त्रिकोण (१,५,९) मध्ये असेल, तथा पाप ग्रह (३,६,११) मध्ये असेल अशा मुहूर्तात पुरुषाला पुत्र प्राप्तीसाठी आपल्या स्त्रीशी समागम केला पाहिजे. मृगशिरा अनुराधा श्रवण रोहिणी हस्त तिन्ही उत्तरा स्वाति धनिष्ठा आणि शतभिषा या नक्षत्रांमध्ये षष्ठी वगळून अन्य तिथी आणि दिवसांत गर्भाधान केले पाहिजे. परंतु चुकून देखील शनिवार, मंगळवार आणि गुरुवारी पुत्र प्राप्तीसाठी संगम करता कामा नये.