Get it on Google Play
Download on the App Store

नामस्मरण - सप्टेंबर १४

जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला ; असा मनुष्य अजरामजर होतो . तो निःस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो . स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्‍याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही . असा सत्पुरुष म्हातार्‍याला म्हातारा , पुरुषाला पुरुष , बाईला बाई , मुलाला मुलासारखा दिसतो ; म्हणजेच , जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते . असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही . मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही . स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसर्‍यांच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो . तो सहजावस्थेत राहतो ; म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही . असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा . अशा लोकांनाच संत म्हणतात ; आणि ते जी जी कर्मे करतात , ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे , त्या कर्मांच्यापासून जगाचे कल्याण घडते . संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम , दया , परोपकार , निःस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील .

अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी . माझे चुकते कुठे हे पाहावे . दुःख भोगण्याची मला पाळी आली , म्हणजे मार्ग चुकला म्हणावे . ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधानी . ‘ मी रोज नामस्मरण करतो , चार वर्षे माझे भजन नाही चुकले , ’ असे आपण म्हणतो ; पण ‘ मी हे सर्व करतो ’ अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग ? मी मेहनत घेतो पण थोडक्याने नासते , ते या अभिमानामुळे . जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते ‘ स्मरण ’ कसे म्हणावे ? भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून , मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल ? मी तुम्हाला खरेच सांगतो , तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा , तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही . खुणेने जावे , संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे , म्हणजे मार्ग सापडतो . खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो . आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते . ‘ भगवंताने माझी आपत्ती दूर करावी . ’ हे म्हणणे वेडेपणाचेच आहे , संकटे , आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही . देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास ! नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो , हे कुठे ध्यानात येते ! उगीच विचार करीत नाही बसू . समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली , हे लक्षात ठेवा .

ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास

स्तोत्रे
Chapters
नामस्मरण - सप्टेंबर १ नामस्मरण - सप्टेंबर २ नामस्मरण - सप्टेंबर ३ नामस्मरण - सप्टेंबर ४ नामस्मरण - सप्टेंबर ५ नामस्मरण - सप्टेंबर ६ नामस्मरण - सप्टेंबर ७ नामस्मरण - सप्टेंबर ८ नामस्मरण - सप्टेंबर ९ नामस्मरण - सप्टेंबर १० नामस्मरण - सप्टेंबर ११ नामस्मरण - सप्टेंबर १२ नामस्मरण - सप्टेंबर १३ नामस्मरण - सप्टेंबर १४ नामस्मरण - सप्टेंबर १५ नामस्मरण - सप्टेंबर १६ नामस्मरण - सप्टेंबर १७ नामस्मरण - सप्टेंबर १८ नामस्मरण - सप्टेंबर १९ नामस्मरण - सप्टेंबर २० नामस्मरण - सप्टेंबर २१ नामस्मरण - सप्टेंबर २२ नामस्मरण - सप्टेंबर २३ नामस्मरण - सप्टेंबर २४ नामस्मरण - सप्टेंबर २५ नामस्मरण - सप्टेंबर २६ नामस्मरण - सप्टेंबर २७ नामस्मरण - सप्टेंबर २८ नामस्मरण - सप्टेंबर २९ नामस्मरण - सप्टेंबर ३०