Get it on Google Play
Download on the App Store

शिव पार्वती संवाद आणि राम रावण युद्ध

राम रावणाचे युद्ध होताना पार्वती शिवाला विचारते कि ह्यांत कुणाचा जय होईल. शिव अतिशय शांत पणे  उत्तर देतात कि "दोघांचाही". पार्वती ह्यामुळे गोंधळून जाते.

शिव स्पष्ट करतात कि युद्धाच्या अंती रामाला त्याची पत्नी मिळून त्याचा जय होईल तर रावणाला मोक्ष रुपी जय प्राप्त होईल. जय विजय हे विष्णूचे द्वारपाल असतात. रावण हा खरे तर जय ह्याचा पुनर्जन्म असतो.

४ कुमार विष्णूला भेटायला आले असता जय विजय त्यांना रोखतात आणि कुमार संतप्त होऊन त्याला श्राप देतात. श्राप असा असतो कि एक तर त्यांना ७ जन्म विष्णूचे भक्त म्हणून घ्यावे लागतील किंवा ३ जन्म विष्णूचे शत्रू म्हणून घ्यावे लागतिल.