Get it on Google Play
Download on the App Store

एकादशी व्रत


बहुतेक सर्व धार्मिक ग्रंथ आणि पुराणांमध्ये एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ सांगण्यात आले आहे. पुराणात सांगितल्याप्रमाणे, जो मनुष्य प्रत्येक एकादशीला पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने व्रत ठेऊन त्याचे पालन करतो, त्याला निश्चितच त्याचे शुभ फळ मिळते. व्रत पालन करण्यासोबतच काही गोष्टी वर्ज्यही कराव्या लागतात, जसे की जुगार खेळणे, मद्यपान करणे, किंवा हिंसा करण्यासारखी वाईट कृत्ये. त्यामुळे एकादशीच्या दिवशी अशा वाम कामांपासून लांब राहावे.