Get it on Google Play
Download on the App Store

अर्थ

*हळू  हळू एक एक शब्द वाचा*

*प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे*


*"अश्रु"* सांगून जाते, *"दुःख"* किती आहे ?


*"विश्वास"* सांगून जातो, *"जोडीदार"* कसा आहे?


*"गर्व"* सांगून जातो, *"पैशाचा माज"* किती आहे?


*"संस्कार"* सांगून जातात, *"परिवार"* कसा आहे?


*"वाचा"* सांगून जाते, *"माणूस"* कसा आहे?  


*"संवाद"* सांगून जातात, *"ज्ञान"* किती आहे?


*"ठेच"* सांगून जाते, *"लक्ष"* कुठे आहे?


*"डोळे"* सांगून जातात, *"व्यक्ती"* कशी आहे ?


*"स्पर्श"* सांगून जातो, *"मनात"* काय आहे ?


आणि 


*"वेळ"* दाखवते, *"नातेवाईक"* कसे आहेत.


भावकीतली चार माणसं *" एका दिशेने "* तेव्हाच चालत असतात जेव्हा *पाचवा खांद्यावर* असतो. 


संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की *" लोक काय म्हणतील " ?* आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की *" राम नाम सत्य है "..*


           माणसाची *कदर* करायची असेल तर *जिवंतपणीच* करा. 


कारण *तिरडी* उचलण्याच्या वेळी *तिरस्कार* करणारे सुद्धा *रडतात.* 


मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची *प्रथा* आहे, आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी *व्यथा* आहे. 

*म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या.*


मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो ..

   

        चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. 

कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते. 


*चांगल्या माणसांच सुद्धा अगदी तसचं असतं ..*