Get it on Google Play
Download on the App Store

शंखचूडाची कथा

दक्षाच्या तेरा कन्या कश्‍यप ऋषींच्या पत्नी होत्या. त्यातीलच एकीचे नाव दनू. तिच्या मुलाचा मुलगा दंभ म्हणून होता. तो धार्मिक वृत्तीचा होता. पुत्रप्राप्तीसाठी त्याने शुक्राचार्यांना गुरू मानून कृष्णमंत्र घेतला व पुष्करला जाऊन घोर तप आरंभिले. भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्रिलोकास जिंकणारा, देवांनाही अजिंक्‍य ठरेल असा पुत्र त्याने मागितला. राधेकडून शाप मिळालेला श्रीकृष्णाचा सखा सुदामा दंभपत्नीच्या पोटी आला. त्याचे नाव शंखचूड असे ठेवले. तो फार तेजस्वी होता. लहानपणीच सर्व विद्या त्याने शिकून घेतल्या. त्रैगीषव्य मुनींच्या सांगण्यावरून त्याने पुष्करतीर्थी जाऊन ब्रह्मदेवाची तपश्‍चर्या केली व देवांनाही अजिंक्‍य होईन असा वर मिळवला. ब्रह्मदेवानी त्याला दिव्य श्रीकृष्णकवच दिले. तसेच बदरीवनात जाऊन तेथे तप करीत असलेल्या तुलसीबरोबर विवाह करावा, असे सांगितले. त्यानुसार तो बदरीकाश्रमात आला. सात्त्विक विचारांनी त्याने तुलसीला जिंकले व तिच्याशी गांधर्व विवाह केला. ब्रह्मदेव प्रकट झाले व त्या दोघांना त्यांनी आशीर्वाद दिला. तसेच मृत्यूनंतर शंखचूड पुन्हा गोकुळात श्रीकृष्णाकडे जाईल व तुलसी वैकुंठात विष्णूंना प्राप्त करून घेईल, असे वर्तवले.

शंखचूडाने देवावर आक्रमण करून त्यांना जिंकले व तो छत्रपती सम्राट बनला. अनेक वर्षे त्याने न्यायाने राज्य केले. दानव असूनही तो श्रीकृष्णभक्त होता. पण राज्य गमावल्यामुळे चिंतित होऊन सर्व देव ब्रह्मदेवांना घेऊन वैकुंठाकडे गेले. श्रीहरींनी शंखचूडाची सर्व हकिगत देवांना सांगितली व त्याचा मृत्यू रुद्राच्या त्रिशूलाने निश्‍चित केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे देवांनी महादेवांना शंखचूडास मारण्याची विनंती केली. शंकर व पत्नी तुलसी यांचा उपदेश न ऐकता शंखचूड युद्धास सज्ज झाला. देवकार्य म्हणून शंकरही युद्धास तयार झाले. जोपर्यंत शंखचूडाकडे श्रीकृष्णकवच आहे व त्याची पत्नी तुलसी हिते पातिव्रत्य अखंड आहे, तोवर शंखचूडावर जरा व मृत्यू यांचा प्रभाव पडणार नाही हे जाणून विष्णूंकडून तुलसीचे पातिव्रत्य मायेने हिरावून घेतले व याचकाच्या रूपात शंखचूडाचे कवच काढून घेतले. शंकरांनी त्रिशूल सज्ज करून शंखचूडाचा नाश केला.

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
हयग्रीव अवतार बौद्धावतार हरिश्‍चंद्र वज्रनाभ राजाची कथा उषा-अनिरुद्ध विवाह यादवांच्या नाशाची कथा महाप्रलयाची कथा व्यासपुत्र शुकाची कथा मुचकुंदाची कथा उर्वशी व पुरुरवा ध्रुवाची कथा अयोध्येच्या धोब्याची कथा गाईचा महिमा दंडकारण्य उत्पत्ती कथा कर्णपुत्र वृषकेतूची कथा नृसिंह व वीरभद्र पाच पांडव व द्रौपदी कलंकी अवतार तपती आख्यान कृपाची जन्मकथा सरस्वतीची झाली नंदा रामभक्त राजा सुरथ श्‍वेतराजाचा उद्धार शिवभक्त वीरमणी रावणकथा विष्णूचे चक्र व गदा वैजयंतीमालेची कथा नंदीची कथा सांबाची सूर्योपासना प्रल्हाद आख्यान पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन शांतीचा मार्ग शंबरासुर वध पारिजात कथा श्रीवत्सलांच्छनाची कथा वृकासुराची कथा स्यमंतक मण्याची कथा १ स्यमंतक मण्याची कथा २ दशरथ कौसल्या विवाह त्रिशंकूची कथा भृगुपुत्र शुक्राची कथा कर्कटी राक्षसीची कथा जीवटाख्यान समुद्रमंथन व राहूची कथा रेणुकेचा जन्म रेणुका स्वयंवर सहस्रार्जुनाची कथा जयध्वजाचे आख्यान सौभरी चरित्र गरुडाचे गर्वहरण पराशर कथा श्रीमतीचे आख्यान कौशिकाचे वैष्णवगायन क्षुप व दधिचाची कथा श्रीरामांची सतीकडून परीक्षा शंखचूडाची कथा शिवांचे अवतार अवदशेची कथा कान्यकुब्ज नगरीची कथा भरताचे मागणे उर्वशी लोपामुद्रा सती सुकन्या नीलम आणि ऋता मैत्रेयी गार्गी सुभद्रा चित्रांगदा देवकी यशोदा