Get it on Google Play
Download on the App Store

श्रीमतीचे आख्यान

ईक्ष्वाकु वंशात अंबरीष नावाचा धार्मिक व न्यायी राजा होऊन गेला. त्याला श्रीमती नावाची अत्यंत सुंदर व गुणी कन्या होती. एकदा महामुनी नारद व पर्वत राजाकडे आले व त्यांनी श्रीमतीची चौकशी केली. राजा अंबरीषाने तिच्यासाठी वरसंशोधन चालू असल्याचे सांगितले. यावर दोघांनीही श्रीमतीशी विवाह करण्याची इच्छा दर्शवली. पण आपण कुणाला तरी एकालाच कन्या देऊ, असे अंबरीषाने सांगताच "आम्ही उद्यापरत येऊ' असे सांगून ते दोघेही निघून गेले. ते दोघेही भगवान विष्णूंचे भक्त होते. नारदमुनी प्रथम विष्णूंकडे गेले व आपणासच ती मुलगी प्राप्त व्हावी अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. यासाठी पर्वतमुनीचे तोंड माकडाप्रमाणे व्हावे असेही त्यांनी मागणे मागितले. विष्णूने तथास्तु म्हटल्यावर नारदमुनी परत अयोध्येस आले. नंतर पर्वतमुनीही विष्णूकडे गेले व त्यांनी श्रीमतीची प्राप्ती आपल्यालाच व्हावी म्हणून नारदाचे तोंड गायीच्या शेपटाप्रमाणे व्हावे, अशी इच्छा प्रदर्शित केली. विष्णूने त्यालाही "तथास्तु" म्हणून परत पाठवले.
अंबरीष राजाने स्वयंवराची सर्व सिद्धता केली. आपल्या कन्येस घेऊन तो तेथे आला. त्यांची तोंडे पाहून श्रीमती घाबरली. राजाने त्या दोघांपैकी एकाच्या गळ्यात माळ घालण्यास सांगताच ती म्हणाली, "हे दोघे असे विचित्र कसे दिसू लागले? या दोघांच्या मध्ये मला अतिशय देखणा, अलंकारांनी नटलेला असा एक तरुण दिसत आहे." श्रीमतीने त्या तरुणाचे वर्णन करताच ही सर्व भगवंताची माया आहे हे दोघा मुनींनी जाणले. श्रीमतीने वरमाला त्या तरुणाच्या गळ्यात घातल्याबरोबर श्रीमतीला विष्णूंनी आपल्याबरोबर विष्णूलोकी नेले. पूर्वकाली उग्र तप करून तिने प्रभूंची प्राप्ती करून घेतली होती.
दुःखी मनाने दोघे मुनी भगवंतांकडे आले. तेव्हा भगवंतांनी श्रीमतीला लपून राहण्यास सांगितले. आपण श्रीमतीस नेले नाही, असे विष्णूने सांगताच ही दुष्टता राजाची आहे असे वाटून ते दोघे अंबरीषाकडे आले. त्यांनी त्याला शाप दिला. त्याला जाळण्यासाठी तमोराशीचे उत्थान केले. पण भगवान विष्णूंच्या सुदर्शनचक्राने तमाला त्रस्त केले व तम दोघा मुनींच्या मागे लागला. विष्णूंची प्रार्थना केल्यावर त्यांनी चक्र व तम यांना आवरले. "आपण दोघांनी कोणत्याच कन्येशी विवाह करायचा नाही," अशी प्रतिज्ञा दोघांनी केली.

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
हयग्रीव अवतार बौद्धावतार हरिश्‍चंद्र वज्रनाभ राजाची कथा उषा-अनिरुद्ध विवाह यादवांच्या नाशाची कथा महाप्रलयाची कथा व्यासपुत्र शुकाची कथा मुचकुंदाची कथा उर्वशी व पुरुरवा ध्रुवाची कथा अयोध्येच्या धोब्याची कथा गाईचा महिमा दंडकारण्य उत्पत्ती कथा कर्णपुत्र वृषकेतूची कथा नृसिंह व वीरभद्र पाच पांडव व द्रौपदी कलंकी अवतार तपती आख्यान कृपाची जन्मकथा सरस्वतीची झाली नंदा रामभक्त राजा सुरथ श्‍वेतराजाचा उद्धार शिवभक्त वीरमणी रावणकथा विष्णूचे चक्र व गदा वैजयंतीमालेची कथा नंदीची कथा सांबाची सूर्योपासना प्रल्हाद आख्यान पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन शांतीचा मार्ग शंबरासुर वध पारिजात कथा श्रीवत्सलांच्छनाची कथा वृकासुराची कथा स्यमंतक मण्याची कथा १ स्यमंतक मण्याची कथा २ दशरथ कौसल्या विवाह त्रिशंकूची कथा भृगुपुत्र शुक्राची कथा कर्कटी राक्षसीची कथा जीवटाख्यान समुद्रमंथन व राहूची कथा रेणुकेचा जन्म रेणुका स्वयंवर सहस्रार्जुनाची कथा जयध्वजाचे आख्यान सौभरी चरित्र गरुडाचे गर्वहरण पराशर कथा श्रीमतीचे आख्यान कौशिकाचे वैष्णवगायन क्षुप व दधिचाची कथा श्रीरामांची सतीकडून परीक्षा शंखचूडाची कथा शिवांचे अवतार अवदशेची कथा कान्यकुब्ज नगरीची कथा भरताचे मागणे उर्वशी लोपामुद्रा सती सुकन्या नीलम आणि ऋता मैत्रेयी गार्गी सुभद्रा चित्रांगदा देवकी यशोदा