Get it on Google Play
Download on the App Store

तेराव्या दिवशी

कौरवांनी चक्रव्युहाची रचना केली. या दिवशी दुर्योधनाने राजा भगदत्तला अर्जुनाला व्यस्त ठेवण्यास सांगितले. भगदत्तने पुन्हा एकदा पांडव वीरांना युद्धात पळवून लावले आणि भीमाचा पराभव केला आणि नंतर अर्जुनाशी भयंकर युद्ध केले. श्रीकृष्णाने भगदत्तचे वैष्णवास्त्र आपल्यावर झेलून अर्जुनाची रक्षा केली.
शेवटी अर्जुनाने भगदत्तच्या डोळ्यांची पट्टी तोडली ज्यामुळे त्याला दिसायचे बंद झाले आणि अर्जुनाने याच अवस्थेत त्याचा वध केला. याच दिवशी द्रोणांनी युधिष्ठिरासाठी चक्रव्यूह रचला ज्याला तोडणे फक्त अभिमन्यूला माहिती होते, परंतु त्यातून बाहेर पडणे त्याला माहिती नव्हते. तेव्हा अर्जुनाने युधिष्ठीर, भीम उत्यादिंना त्याच्यासोबत पाठवले परंतु चक्रव्यूहाच्या द्वारावर ते सर्व जयद्रथाकडून त्याला मिळालेल्या शिवाच्या वरदानामुळे अडवले गेले आणि केवळ अभिमन्यूलाच प्रवेश करता आला.
या लोकांनी केला अभिमन्यूचा वध : कर्णाच्या सांगण्यावरून सातही महारथी कर्ण, जयद्रथ, द्रोण, अश्वत्थामा, दुर्योध्दन, लक्ष्मण आणि शकुनीने एकाच वेळी अभिमन्युवर आक्रमण केले. लक्ष्मणाने जी गदा अभिमन्यूच्या डोक्यावर मारली तीच गदा अभिमन्यूने लक्ष्मणाला फेकून मारली. यामुळे दोघांचाही त्याच वेळी मृत्यू झाला.
अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी ऐकून अर्जुनाने सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला मारण्याची अन्यथा अग्नी समाधी घेण्याची प्रतिज्ञा केली.
पांडव पक्षाचे नुकसान : अभिमन्यू
कोण मजबूत राहिले : पांडव