Get it on Google Play
Download on the App Store

एका भारतीयाचे उद्‍गार

संध्याकाळीं बघुनि सगळी कान्गि ती पश्चिमेला
वाटे सद्यःस्थितिच अपुली मूर्त ती मन्मनाला;
हा ! हा ! श्रीचा दिवस अपुल्या मावळोनी प्रतीचे
गेला ! गेला !” सहज पडती शब्द हे मन्मुखाचे.

तेणें माथें फिरुनि सगळें जें म्हणोनी दिसावें,
त्या त्या मध्यें स्वजनकुदशा वाचुनी मीं रडावें !
जे जे चित्तीं बहुतकरुनी तें सुषुप्तींत भासे ”
वृद्धांचें हें अनवितथ हो वाक्य होईल कैसें ?

प्रातः कालीं रवि वरिवरी पाहूनी चालतांना,
होई मोदातिशय बहुधा सर्वदा या जनांना;
पूर्वींची तो स्थिति परि करी व्यक्त ती वाचुनीयां
एकाएकीं ह्रदय मम हें जातसे भंगुनीयां !

हा जैसा का रवि चढतसे त्याप्रमाणेंच मागें
स्वोत्कर्षाचा रविहि नव्हता वाढता काय ?-- सांगें;
जावोनी ती परि इथुनियां पश्चिमेशीं रमाया,
र्‍हासाची ही निबिड रजनी पातली ना छळाया ! ”

वल्लींनो ! हीं सुबक सुमनें काय आम्हांस होत ?
युष्मद्‍गानें मधुर, खग हो ? या जनां काय होत ?--
आम्हां डोळे नसति बघण्या पारतंत्र्यामुळें हो !
ऐकायाला श्रुतिहि नसती पारतंत्र्यामुळें हो !

आहे आम्हांवर जव निशा पारतंत्र्यांधकारें,
वाहे जो का उलट कुदर्शचें तसें फार वारें,
सौख्याचें तोंवरि फुकट तें नांव व्हावें कशाल ?--
दुःखाचा तोंवरि खचित तो भोग आहे अम्हांला !

आनन्दाचे सर्मांय मजला पारतंत्र्य स्मरून
वाटे जैसें असुख तितुकें अन्य वेळीं गमे न !
पाहोनीयां विष जरि गमे उग्र तें आपणांतें,
अन्नामध्यें शपपट गमे उग्रसें पाहुनी तें !

” देवा ! केव्हां परवशपणाची निशा ही सरून
स्वातंत्र्याचा धुमणि उदया यावयाचा फिरून ?
केव्हां आम्ही सुटुनि सहना पंजरांतूनि, देवा,
राष्ट्रत्वाला फिरुनि अमुचा देश येईल केव्हां ?”