Get it on Google Play
Download on the App Store

श्री त्रिलोचनेश्वर महादेव

 

बिरजनामा मंदिर पीठावर स्थित त्रिलोचनेश्वर महादेव मंदिरात खूप काळापूर्वी एक काबुताराचा जोडा राहत होता. दोघेही देवाचे दर्शन घेत, अर्पित जल प्रश्न करत, भक्तांनी केलेले जयजयकार, भजन, कीर्तन सर्व ऐकत राहत. एक दिवस एक श्येन तिथे आला आणि विचार करू लागला की मी या कबुतरांना कसे खाऊ? काबुतरीने श्येनाला पहिले आणि चिंतातूर होऊन कबुतराला सांगितले की तो श्येन आपल्याला खायला आला आहे. एक दिवस श्येन कबुतराला पकडून आकाशात घेऊन गेला. काबुतरीने त्याच्या पंजाला चावा घेतला ज्यामुळे कबुतर सुटून खाली पडला आणि जम्बुद्धीपात पडून मारून गेला. पुढच्या जन्मात तो कबुतर मंदारा नावाच्या गन्धर्वाकडे परिमल नावाने जन्माला आला. दुसरीकडे काबुतारीने नागराजाकडे रत्नावलीच्या रुपात जन्म घेतला. परीमल किशोरावस्थेपासूनच त्रिलोचनेश्वर महादेवाच्या दर्शन पूजनासाठी अवंतिका नगरात येऊ लागला. इकडे रत्नावलीने देखील महादेवाच्या दर्शन पूजनासाठी यायला सुरुवात केली. एक दिवस रत्नावली मैत्रिणींसोबत मंदिरातच झोपली. तेव्हा भगवान शंकराने दर्शन देऊन तिला पूर्वजन्माची कहाणी सांगितली आणि म्हणाले की परिमल मागच्या जन्मी तुमचा पती होता. त्यांनी आपल्या आई वडिलांना ही गोष्ट सांगितली. एकदा परिमल आणि नागराज पूर्ण परिवारासोबत त्रिलोचनेश्वर महादेवाचे पूजन करण्यासाठी आले. इथे दोन्ही परिवारात शिप्राने कन्यांना दिलेल्या वरदानाची चर्चा झाली आणि परिमल सोबत विवाह करून देण्यात आला. त्यानंतर परिमल तिथेच राहून पूजन करू लागला. असे मानले जाते की जो कोणी मनुष्य त्रिलोचनेश्वर महादेवाचे दर्शन पूजन करेल तो सर्व सुखे उपभोगुन अंती मोक्षपदाला जाईल.