Get it on Google Play
Download on the App Store

61 संकट

युद्ध ,ज्वालामुखी उद्रेक ,भूकंप, जलप्रलय ,इत्यादी नैसर्गिक किंवा पर्यावरण नाश ,मर्यादित साधन संपत्तीचा हवा तसा वापर इ.,मानवनिर्मित भौतिक संकटाबद्दल मी बोलत नाही तर एका वेगळ्या संकटाबद्दल मला बोलावयाचे आहे .आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्याही वाईट असत्य अन्याय मार्गाचा अवलंब केला तरी हरकत नाही किंबहुना तो योग्यच होय अशा प्रकारची धारणा निर्माण करणे अशा प्रकारचे हे संकट आहे .समजा क्षणभर गृहीत धरले की हेतू खूप चांगला आहे परंतु जर अयोग्य मार्गांचा अवलंब केला तर ते कितपत योग्य ठरेल .ब्रेन वॉशिंग करून मनाची रचना अशी बदलावयाची की कितीही क्रूर कृत्य करण्याला मनुष्य सहज तयार होईल।अशा प्रकारे तरुण हाताशी धरून, त्यांची मनोरचना बदलून, वाटेल ते घातक कृत्य करण्यासाठी त्यांना तयार केले जात आहे. फॅसिझम  कम्युनिझम नक्षलवाद माओवाद मुस्लिम देशांतील निरनिराळे  अतिरेकी गट तथाकथित हिंदू अतिरेकी हे केवळ प्रचंड प्रमाणात हत्या करतात एवढेच नव्हे तर असे एक तत्त्वज्ञान  निर्माण करतात की त्यांच्या मताप्रमाणे जे ध्येय  उज्ज्वल मंगल व योग्य आहे त्यासाठी कितीही निरपराध लोकांचे शिरकाण करण्यास काहीही हरकत नाही त्यातून पुण्यच संपादन होईल .अश्या प्रकारच्या तत्त्वज्ञानामुळे व्यक्ती  व व्यक्तींचे गट क्षणार्धात स्वत:ला संपवण्यास तयार होतात.या कल्पनांवरील हल्ल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रक्तपात होत आहे .पूर्वी सत्ता संपत्ती मिळवणेसाठी रक्तपात केला जाई .आता मनोरचनेत बदल करून कल्पनांवर हल्ला करून ते साध्य केले जात आहे. कोवळी तरुण मुले त्या तथाकथित  उच्च  मंगल ध्येयासाठी स्वत:ला व इतरांना संपवण्यास कचरत नाहीत .

जर यात बदल घडवून आणावयाचा असेल तर एका धारणे ऐवजी दुसरी धारणा निर्माण करणे हा योग्य मार्ग ठरणार नाही असे मला वाटते .आपण पुन्हा तीच चूक करू  .व्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे .व्यक्तीला मनोरचना ,संस्कार ,त्यातून निर्माण होणारी धारणा ,त्यातून येणारी प्रेरणा, या  सर्वाचा उलगडा जेव्हा होईल तेव्हा आपोआपच तो मूलत: बदलेल. हा बदल ही नव्याची नांदी असेल .प्रत्येक व्यक्तीचे समजातून झालेले  मूलगामी परिवर्तन हेच सर्वांचे उत्तर असेल.

विचारतरंग

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
1 अनाग्रह योग  2 अपेक्षा 3 अहंकार (निरहंकार) 4 आनंदाची गुरुकिल्ली  5 आपण कशाच्या शोधात आहोत ? 6 आपण कसे ऐकतो व कसे ऐकले पाहिजे 7 आपण कुठे असतो ? 8 एक होता ससा व एक होते कासव 9 साधू 10 एकनाथ महाराज 11 कंटाळा 12 क्रोध 13 क्षणभंगुर 14 खरा बलवान कोण 15 खरे स्वातंत्र्य 16 गुरूची आवश्यकता आहे काय 17 चक्रवर्ती 18 जादूचा चेंडू 19 जीवनाची अपरिहार्यता 20 ज्ञात व अज्ञात 21 ज्ञानसागर 22 टीका 23 तुझे रूप चित्ती राहो तुझे मुखी नाम 24 तू माझा सांगाती 25 दिवा स्वप्न व कठोर परिश्रम 26 दुःख क्लेश इत्यादी 27 दृष्टिकोन - काका कालेलकर 28 देवदास 29 देैव व प्रयत्न 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी- 31 धर्म 32 धारणा 34 नार्सिसस 35 निरहंकारी शंकराचार्य 36 परमेश्वर 37 पोकळी 38 प्रतिक्रिया 39 प्रार्थना एकाग्रता व ध्यान 40 प्रेम 41 फूटपटया 42 बदल 43 बदला बद्दल 44 बहिर्मन व अंतर्मन 45 बोधकथा 46 भगवान 47 भीति 48 भूतकथा 49 मानसिक गोंधळा विषयी 50 मी कोण? 51 मृत्यूची भीती 52 मोह व भीति 53 राष्ट्राभिमान 54 रिकामपणाची बडबड 55 विश्वास 56 शरण जाणे 57 शांततेचे महत्त्व (आजोबा व त्यांचा नातू ) 58 शिक्षण ज्ञान व सत्य 59 शिस्त 60 श्रद्धा 61 संकट 62 संत उमर आणि भटका माणूस 63 सत्य व असत्य 64 संबंधमयता 65 समज व समंजसपणा 66 समर्थन ६७ समस्या ६८ साधू व विंचू ६९ सुख व दुःख ७० स्मरण ७१ स्वनिरीक्षण व जागृतता ७२ स्वर्ग आणि नरक ७३ स्वशॊध ७४ स्वावलंबन ७५ हिमनग ७६ कलियुग ७७ दिव्य दृष्टी ७८ काळोख ७९ मीचे दृढीकरण