Get it on Google Play
Download on the App Store

जे होतं ते चांगल्यासाठीच

एकदा अकबर आणि बिरबल
शिकरीला जात असतात, तलवार
काढताना अकबर चा अंगठा कापला जातो... अकबरला खूप त्रास होतो,
तो ओरडायला लागतो...
तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून...
शहरात पाठवतो... तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ
जातो आणि म्हणतो, ''महाराज...शांत
व्हा...जे होतं ते चांगल्यासाठीच होतं...'' अकबर ला राग येतो...तो जास्तच
चिडतो...आणि शिकयांना सांगतो
'' जा बिरबल ला घेऊन जा...रात्रभर उलटं
टांगून ठेवा....आणि सकाळी-
सकाळी फाशी द्या '' सर्व शिपाई तिथून निघून
जातात....अकबर एकटाच जंगलात
असतो....तो एकटाच पुढे शिकार
करायला जातो...!! पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन
जातात, आणि त्याला डांबून ठेवतात..
अकबर ची बळी ते देणार असतात...त्यासाठ
ीची विधी करण्यात आदिवासी मग्न
होतात...तितक्यात
एका आदिवासी ची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व
तो ओरडून सर्वांना सांगतो ,'' हा अशुद्ध
आहे...आपण याची बळी नाही देऊशकत...
याचा अंगठा तुटलेला आहे...'' आदिवासी अकबर ला सोडून
देतात...आणि त्याला बिरबल चं बोलणं
आठवतं,
' जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..' तो धावत पळत त्याच्या महलात येतो,
बिरबल ला फाशी होणारच असते
तितक्यात तो तिथे जाऊन बिरबल
ला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत
सांगतो....आणि म्हणतो, '' मला माफ
कर....तुझ्यामुळे मी वाचलो...आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली....'' बिरबल हसतो आणि म्हणतो,
''नाही महाराज....जे होते ते चांगल्यासाठीच
होता...'' अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं
कसं...तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला...चांगलं
कसं झालं??? त्यावर बिरबल म्हणतो, '' महाराज...मी जर
तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर
त्यांनी माझा बळी दिला असता.....म्हणून
म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.... '' तात्पर्य : मित्रांनो, आयुष्यात असे क्षण
येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण
लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच
होतं....कदाचित पुढे त्याचा ऊपयोग
तुमच्या चांगल्यासाठी होईल...!!!