Get it on Google Play
Download on the App Store

रावबाजीवर

उटया केशरी टिळा कस्तुरी कमालखानी हार गजरे । गहेनाजी बहेनाजी अक्षयीं जवळ पालखिच्या हुजरे ।

जुनी माणसें तीं कणसाला महाग गैर त्याची बुजरे । चार चटारी भटारी हलके जाणुनिगे अलबत हुजरे ।

सुंदर स्त्री दुसर्‍याची तिसरा दे बैल गुतुन अवता । शाल्योदन मिष्‍टान्न भोगता सवा शेर ज्याचा सवता ।

चोवीस वर्षें चैन भोगिली राज्यकांति जाणुन नवता ॥धृ०॥१॥

जो नीचकर्मी लइशी गुर्मीं कुटुंब दाखल नजराणा । प्रभु फार संतोष न किमपी दोष निजा इजजवळ जाणा ।

असें अवश्य घडवी अडवी तिडवी चार प्रहर दम द्या ताणा । दौलतीस बाजीराय करिल अपाय म्हणत होते नाना ।

खेळ करुनि उफराटा वरंटा पाटा रयतेच्या भवता ॥शाल्यो०॥२॥

कुलकल्ला त्रिंबकजी डेंगुळ अगदिं राहिले दिडबोट । पंढरपुरीं महाद्वारी शास्त्री ठार केले कर्मच खोटे ।

चौकुन मग इचकोबा तोबा हाय सुकुन गेले ओठ । आळ येतांच चंडाळ गडावर पदरीं काय पडला धोट ।

सर्वांची रग जिरली ह्मणुनी तळि भरली आला दीप मालवता । फंदी मूल ह्मणे असती विरस !

कां गादि पुण्याची घालवता । शाल्योदन मिष्‍टान्न०॥धृ०॥३॥