Get it on Google Play
Download on the App Store

भाग ५

अगदी हाॅरर मूव्हीसमध्ये दाखवल्याप्रमाणे ती मुलगी त्याच्यासमोरून एका झटक्यात गायब झाली होती.. आपण ह्या गावात येवून खरंच खुप मोठी चूक केली हे पदोपदी त्याला जाणवत होतं.. ST मधून उतरताना त्या म्हाता-या माणसाचं ऐकलं असतं तर ह्या फंद्यात अडकलोच नसतो..!! कुठे अडकून टाकलं मी स्वतःला नसत्या भानगडीत.. देवाऽऽ मला ह्यातून सुखरूप बाहेर काढ.. प्लीजऽऽ.. स्वतःच्या कमनशीबी पणाला दोष देत तो देवाचा धावा करू लागतो.. हनुमान चालीसा म्हंटल्याने भूत-प्रेत आपल्या समोर येत नाहीत हे आठवल्यावर तो हनुमान चालीसा येत नसतानाही तुटक्या-फुटक्या शब्दांत जमेल तसं बोलायला लागतो..हनुमान चालीसीचा आवाज ह्या सुमसान वाटेत आस-पास घुमायला लागला.. हनुमान चालीसीमुळे त्याला आता थोडं हायसं वाटत होतं.. एक आधार वाटत होता जो त्याला ह्या क्षणी खुप महत्त्वाचा होता.. काही वेळ असाच हनुमान चालीसेच्या घुमणा-या आवाजात गेला.. पण, ही काळरात्रं त्याला अशी सहजासहजी सोडणारी नव्हती..!! पुढे काय घडणार ह्याची साधी पुसटशी कल्पना नसतानाच अचानक त्याच्या कानाला पुन्हा कोणाचा तरी आवाज ऐकू येतो.. ह्यावेळी आवाज कोणत्या स्त्रीचा नव्हता तर काही माणसांचा होता..!! ते आपआपसांत काहीतरी बडबडंत होते.. समीर ह्या अनपेक्षीत आवाजाने हनुमान चालीसा बोलणं थांबवतो आणि तो ऐणारा आवाज नीट कान देवून ऐकू लागतो.. आवाज तर तीन-चार जणांचा येत होता..!! ती माणसं कसल्यातरी विषयावरून कुजबूजंत होती.. पण नक्की काय बोलत होती हे त्याला स्पष्ट ऐकू येत नव्हतं.. तो आवाजाच्या दिशेने हळू-हुळू पावलं वळवतो.. मनातल्या मनात हनुमान चालीसा सुरू झाली होती बोलायला.. ऐवढ्या गारठवणा-या थंडीतही तो भितीमुळे घामाने ओलाचिंब झाला होता..!! खिशातला रूमाल काढून तो जमेल तेवढा घाम आधीच घामाने भिजलेल्या रूमालाने टिपत होता..

समीर आता त्या आवाजाच्या दिशेने थोडा पुढे सरकत होता.. जस-जसा तो आवाजाच्या दिशेच्या जवळ पोहचायला लागला तस-तसा त्याला अस्पष्ट येणारा आवाज थोडा स्पष्ट यायला लागला होता.. सावध पावलं टाकत तो शक्य तेवढं त्या आवाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता.. पण, अचानक समीरचे पावलं जागच्या जागीच खिळली जेव्हा त्या कुजबूजणा-या माणसांपैकी कोणी एकाने सावित्रीचं नाव घेतलं..!! थोडा वेळ तर त्याला त्याच्या कानावर विश्र्वासंच बसला नाही.. कदाचित सावित्री नाव सारखं डोक्यात घोळत असल्यामुळे आपल्याला चूकून तिचंच नाव त्यांच्याकडून ऐकण्यात आलं असावं असं त्याला वाटायला लागलं.. पण नाही.. त्याने चूकून सावित्रीचं नाव नव्हतं ऐकलं.. ना ही त्याचा तो भ्रम होता.. तर खरंच त्या माणसाने सावित्रीचंच नाव घेतलं होतं.. समीरला ह्याची खात्री तेव्हा झाली जेव्हा त्यांच्यातलंच कोणी दुसरा माणूस सावित्रीच्या नावाचा उल्लेख करून बोलला, "सावित्रीला आज सोडायची नाही आपण.. सालीने गावात जावून आपल्या नावाने बोभाटा करण्याच्या आधीच संपवून टाकूया तिला.." तो माणूस आवाजामध्ये जरब आणून बोलत होता.. समीरला काय करावं काहीच कळत नव्हतं.. त्याला एकट्याला ह्या सर्वांना थांबवणं शक्यच नव्हतं.. त्यात कोणाची मदत घ्यायचं म्हंटलं तर दूर दूरपर्यंत चिटपाखरूसुध्दा नव्हतं.. अश्यात जे काय करायचं ते त्याला स्वतःलाच करायचं होतं आणि तेही शांत डोकं ठेवून.. त्यामुळे तो आता त्या माणसांवर नजर ठेवायचं ठरवतो.. पण, नजर ठेवायची तरी कशी..?? कारण, त्या माणसांचा आवाज तर ऐकू येत होता पण, ती माणसं आसपास कुठेच दिसत नव्हती..!! आवाज हा तर अगदी त्याच्या समोरूनंच ऐकू येत होता, पण दिसत मात्र कोणीच नव्हतं..!! अंधार जरी जास्तं असला तरी तिथे लपण्यासाठी कोणती खास जागा नव्हती.. त्यामुळे कोणी झाडा-झुडपाआड लपून बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.. अचानक समीरच्या डोक्यात एक शंकेची पाल चूकचूकली.. ती माणसं सावित्रीच्या नावाचा उल्लेख करत होते.., ती सावित्री मला whatsappवर मॅसेज पाठवत होती.., नंतर तिचा चेहरादेखील दिसला होता.., मग ती अर्धनग्न बाई दिसून गायब झाली..आणि आता ही माणसं.. ह्या सर्वांचा परस्पर काहीतरी संबंधं नक्कीच असणार.. कोणाचा आवाज येतोय तर कोणी समोर येवून अचानक गायब होतोय..!! हे सर्व अतृप्त आत्मेच आहेत.. जे इथे मुक्तीसाठी भटकत आहे.. ह्या अतृप्त आत्म्यांमुळे समीरची छाती भितीने वर खाली होत होती.. त्याच्या आयुष्यात असं काही घडेल हे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं...!!!

रात्रं जवळ-जवळ ढळायला आली होती.. समीर वर आकाशाकडे बघायला लागतो.. अंधाराची शाल हटून आता तिथे उजेडाची हलकीशी सोनेरी किनार दिसायला सुरूवात झाली होती.. थोड्याच वेळात सुर्योदय होईल ह्या आशेने समीरच्या जीवात जीव आला होता.. पण.. सुर्योदयाला अजून थोडा अवकाश बाकी होता.. त्यामुळे तो जेवढं शक्य होईल तेवढं भरभर पळत ह्या जागेपासून दूर जायचा प्रयत्न करत होता.. पण, इथे मात्र घडलं उलटंच..!! ऐवढं धावूनसुद्धा समीर आता परत त्याच बस स्टाॅपजवळ येवून पोहोचला होता.. ते बस स्टाॅप बघून तो जोरात कपाळावर हात मारतो.. ज्या बस स्टाॅपपासून हे सर्व सुरू झालं होतं बरोबर तिथेच त्याला कोणत्या तरी अदृश्य शक्तीने आणलं होतं..!! सर्वच भयानक आणि अंगाला कापरं भरवणारं होतं.. हि भिती आता त्याच्या मनावर खोल घाव करत होती.. तो ह्या निर्जण आडवाटेवर धाय मोकलून रडायला लागतो.. त्याची मानवी बुद्धी हे सर्व समजण्यासाठी सक्षम नव्हती.. कारण, हे सर्व शैतानी शक्तींचं काम होतं आणि ही शक्ती साधारण मनुष्याच्या बुद्धीला पेलवणारी नव्हती.. हा सर्व प्रकारंच अकल्पणीय आणि तेवढाच भयानक होता..!! हातांनीच डोळ्यांतून निघणा-या पाण्याला थांबण्याचा प्रयत्नात असताना त्याची नजर त्याच्यापासून सहा-सात पावलं अंतरावर असणा-या बस स्टाॅपजवळच्या बाकड्याकडे जाते.. तेव्हा त्याला तिथे एक आकृती दिसते.. डोळ्यांतलं पाणी हाताने नीट पुसून तो परत निरखून बाकड्याजवळ बघायला लागतो.. बघता-बघता तिथे अजून चार आकृत्या दिसायला लागतात..!! जी पहिली आकृती त्याला दिसली होती ती एका स्त्रीची वाटत होती.. आणि बाकीच्या आकृत्या ह्या माणसांगत दिसत होत्या..!! त्या माणसांच्या शैतानी आकृत्या त्या स्त्री आकृतीचे केसं पकडून, तिला जमिनीवर पाडून फरफटत बाकड्यापाशी आणतात.. आणि मग त्यांच्यातली एक शैतानी आकृती सु-यासारखा कसला तरी हत्यार काढून सरळ तिच्या पोटात घुसवतो..!! हत्यार पोटात घुसताचक्षणी त्या स्त्री आकृतीच्या तोंडातून एक काळजाला चिरून टाकणारी किंकाळी बाहेर पडते.. आणि त्या किंकाळीबरोबरंच समीरही भितीने पाढराफिट्टं होवून उभा असलेल्या जागेवरंच चक्कर येवून धाडकन खाली कोसळतो..!!

क्रमशः