प्रकरण चौथे

जरासंधवधाची कथा व त्यावरील माझे मतप्रदर्शन आपण वाचलेत. जरासंधाच्या वधानंतर पांडवानी सर्व राजांकडे दूत पाठवून संमति मिळवून मग राजसूय यज्ञ केला. पांडवांच्या या राजसूययज्ञाच्या वेळी यज्ञ संपल्यावर सर्व राजेलोकांचा सन्मान व अहेर झाले. त्यांत प्रथम सन्मान कोणाचा करावा यावर खूप वादविवाद झाला. पांडवाना कृष्णाचा सन्मान प्रथम करावयाचा होता व शिशुपालाला हे मान्य नव्हते. यावरून झगडा होऊन कृष्णाने शिशुपाल या आपल्या दुसऱ्या वैऱ्याचा अचानक वध केला. ह्या कथेने महाकाव्यांना जन्म दिला आहे व कृष्णाला या कृत्याबद्दल महान मानले जाते. प्रत्यक्षात या कथेचा महाभारतातून चिकित्सकपणे मागोवा घेतला तर या कृत्याबद्दल कृष्णाला थोर म्हणणे अवघड आहे असे माझे मत बनले आहे. माझे या विषयावरील पूर्वीचे लेखन ट्रु-टाइप फॉन्ट मध्ये होते व तो लेख छापलेला माझेपाशी आहे त्यामुळे पुन्हा सर्व मजकूर युनिकोड मध्ये टाइप करण्याऐवजी त्या लेखाचे फोटो देत आहे. आवश्यक तर फोटोवर क्लिक करून वाचावे अशी विनंति आहे.