राघव चेतन आणि अल्लाउद्दिन खिलजी
आपल्या अपमानाने नाराज होऊन राघव चेतन दिल्लीला गेला. त्याचे लक्ष्य होते दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याला चित्तोड वर आक्रमण करण्यास उद्युक्त करणे. दिल्लीला गेल्यावर राघव चेतन दिल्लीच्या जवळ एका जंगलात थांबला जिथे सुलतान नेहमी शिकार करण्यासाठी येत असत. एक दिवस जेव्हा राघवला समजले की सुलतानाचे शिकारी दल जंगलात प्रवेश करत आहे. तेव्हा राघव चेतनने आपल्या बासरीतून माद्धुर्र स्वर काढायला सुरुवात केली.