Get it on Google Play
Download on the App Store

शिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.

राजपुरीच्या किल्ल्यावर मध्यरात्री दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट झाला. मराठी सैन्य मारले गेले. जे कोणी मराठे सिद्दींना जिवंत सापडले त्यांचेही मरण अटळच होते. किनाऱ्यावर वा सागरात एखाद्या गलबतावर सिद्दींना कुणी मराठे सैनिक जिवंत सापडले , तर त्यांना हे सिद्दी कधीही सोडत नसत. त्यांना ते भयंकररीतीने ठार मारत असत. शिवाजी महाराजांचे सैनिक होणे हे एक खडतर व्रतच होते. हे व्रत शिवसैनिकांनी तान्हाजीप्रमाणे , बाजी प्रभूप्रमाणे , बाजी पासलकरांप्रमाणे , येसबा दाभाड्यांप्रमाणे आणि गडकोटांच्या तटाबुरुजांप्रमाणे सांभाळलं.

एक विलक्षण गोष्ट या राजपुरीच्या भयंकर रात्री घडली. शिवाजी महाराज हे रायगडापासून एक मजल अंतरावर या रात्री छावणीत होते. मध्यरात्रीचा हा सुमार. महाराजांना गाढ झोप लागली होती. एवढ्यात अचानक महाराज दचकून जागे झाले. पहाऱ्यावर असलेली भोवतीची मराठी माणसे झटकन जवळ आली. महाराज एकदम का जागे झाले अन् का बेचैन झाले हे त्यांना समजेना. महाराज त्यांना म्हणाले , ‘ काहीतरी भयंकर घोटाळा झाला आहे. ताबडतोब दांडा राजपुरीकडे स्वार पाठवा. खबर आणा. ‘

एक दोन स्वार राजपुरीच्या रोखाने दौडत गेले. राजपुरीच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच त्यांना समजले की , रात्री राजपुरीवर सिद्द्यांचा हल्ला झाला. दारूगोळ्याचं कोठार उडालं. राजपुरी गेली. सिद्द्यांचे निशाण लागले. स्वार परतले. महाराजांना ही खबर त्यांनी सांगितली. हा एक फार मोठा धक्काच होता. दु:खही होते. पण उपाय काय ? जंजिऱ्याची मोहिम महाराजांनी तहकूब केली. ते रायगडास खिन्न मनाने परतले. राजपुरीचे अपयश कुणामुळे ? या खबरा इंग्रजास समजल्या. त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे अर्थ लावला की , मराठी सैनिक राजपुरीस दारू पिऊन चैनीत नाचगाणी करीत होते. त्यामुळे हा पराभव मराठ्यांचा झाला. पण ही शक्यता वाटत नाही. कारण लष्करी छावणीत आणि किल्लेकोटांत ताडी , माडी , दारू वा अमलीपदार्थ यांना सक्त बंदी होती. राजपुरीसारख्या जंजिऱ्याच्या ऐन तोंडावर असलेल्या या मराठी ठाण्यांत अशी दारूबाजी घडणे संभवनीय वाटतच नाही. शिवकालीन स्वराज्याच्या इतिहासात अशा गाफीलपणाने वा व्यसनबाजीने आत्मघात झाल्याचे एकही उदाहरण अजून तरी सापडलेले नाही. हा व्यसनबाजीचा आरोप महाराजांनीही केल्याची नोंद नाही.

हा केवळ त्रयस्थांनी केलेला तर्क आहे. मात्र शत्रूचेही कौतुक केले पाहिजे की त्यांनी मराठ्यांइतकेच कुशलतेने गनिमी काव्याचे युद्धतंत्र वापरून हा अवघड डाव फत्ते केला. यातूनही खूप शिकण्यासारखे असते. शत्रूचे डावपेच कसे असू शकतात याचाही धडा मिळतो. राजपुरीमुळे जंजिऱ्याची मोहीम स्थगित करावी लागली आणि महाराजांनी मोर्चा वळविला मोगलांकडे. यापूवीर् कोकण किनाऱ्याचा महाराज किती गंभीरपणे विचार करीत होते हेही लक्षात घेण्यासारखे आहे. महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांचे वास्तव्य सर्वांत जास्त दिवस कोकण भागात झाले. कोकणात किल्ले दोन प्रकारचे. सागरी आणि किनारी. सागरी किल्ला बेटावर बांधलेला असायचा. त्याला म्हणायचे जंजिरा आणि किनाऱ्यावरचा किल्ला हा एका किंवा दोन बाजूंनी जमीन असलेला आणि एका बाजूनी समुद असलेला असा असायचा. महाराष्ट्राच्या एकूण सागरी किनाऱ्यावर सागरी आणि किनारी अशा किल्ल्यांची संख्या सुमारे ६५ होती. त्यापैकी खांदेली उंदेली , दुर्गाडी , अलिबागपासून ते तेरेखोलपर्यंत बहुसंख्य किल्ले महाराजांनी काबीज केलेले होते. काही थोडेसेच किल्ले जंजिरेकर सिद्दी , पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज यांच्या ताब्यात होते. मुंबईचा किल्ला , ज्याला आपण आज फोर्ट म्हणतो , तो इंग्रजांनीच बांधला. माहिमपासून थेटवर सुरतेपर्यंत कोकण किनाऱ्यावर महाराजांची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. हा भाग मुख्यत: पोर्तुगीज , इंग्रज आणि मोगल यांच्या कब्जात होता.

महाराजांचे आरमार उत्तम होते. यात शंका नाही. साठ किंवा काही साठाहूनही अधिक टन वजनाची गलबते स्वराज्यात होती.

आरमारावरील माणसे उत्तम दर्जाची लढाऊ होती. खरोखर त्यांच्या शौर्याला तोड नव्हती. स्वराज्यात असलेले किनाऱ्यावरचे एकही ठाणे शत्रूला कधीच जिंकता आले नाही. यातच या सागरी समाजांचे म्हणजे आगरी , कोळी , भंडारी आणि कोकणी मराठे यांचे सार्मथ्य अन् निष्ठा व्यक्त झाली होती. पुढच्या काळात तर औरंगजेबाला महाराष्ट्राशी पंचवीस वर्ष अव्याहत झुंजूनही कोकणात अजिबात यश मिळाले नव्हते. शाहजादा अजीम , शहाबुद्दीन खान आणि सरदारखान यांच्यासारख्या उत्तम मोगली सेनापतींनाही कोकण किनाऱ्यावर यश मिळाले नव्हते. उलट त्यांनी मारच खाल्ला होता. क्वचित कल्याण भिवंडीसारखे खाडीवरचे मराठी ठाणे मोगलांनी जिंकले. पण ते पुन्हा मराठ्यांनी थोड्याच अवधीत काबीज केले , असे दिसून येते.

कोकणात स्वराज्य आल्यानंतर एक गोष्ट निश्चित प्रभावीपणे दिसून येत गेली की , कोकणी गावांना व जनतेला चाचे लोकांचा आणि फिरंगी घुसखोरांचा उपदव झाला नाही. तो बंदच झाला. कोकणातील जनतेला फार हाल सहन करावे लागत होते. ते पूर्ण बंद झाले. महाराजांनी आता तर राजधानीच कोकणात आणली. रायगड हा कोकण आणि मावळ यांच्या घाटमाथ्यावरच उभा आहे. महाराजांनी सर्वात जास्त उपयोग करून घेतला , कोकणातील मनगटांचा आणि बुद्धीमत्तेचा. राष्ट्र उभे करायचे असेल तर सोन्याच्या कणाकणाप्रमाणे गुणी , कष्टाळू , प्रामाणिक आणि हुशार माणसे वेचावी लागतात. त्यात जातीपातींचा भेदभाव करून चालत नाही. तो केल्यास राष्ट्र कधीही समर्थ होत नाही. संपन्नही होत नाही. गुणी माणसे हाताशी धरून ती घडवावी लागतात. महाराजांनी अशी माणसे घडविली.

दौलतखान , लायजी सरपाटील , मायनाक भंडारी , सिदी मिस्त्रीखान , इब्राहिम खान , वल्लभदास , सुंदरजी परभुज , बाळाजी आवजी चित्रे , रामाजी अनंत सुभेदार , दादंभट उपाध्ये , विश्वनाथ भट्ट हडप , बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर , सुभानजी नाईक , कृष्णाजी नाईक , अडिवरेकर तावडे , दसपटीकर शिंदे मोकाशी , खानविलकर , सावंत , धुळप , शिकेर् , केशव पंडित पुरोहित , आंगे , दर्यासारंग आणखी किती नावं सांगावीत ? शाई पुरणार नाही. कागद पुरणार नाही. महाराजांचे मन मात्र अशी माणसे जमविताना पुरून उरत होतं. म्हणूनच कोकणपट्टा अजिंक्य बनला. ही सांगितलेली यादी मुख्यत: कोकणातील कर्तबगार घराण्यांचीच आहे.
-बाबासाहेब पुरंदरे

राजे शिवछत्रपती Shivaji Maharaj

गणेश पावले
Chapters
ते आम्ही---! शिवकालीन दिनविशेष छातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना. शिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं! शिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली… शिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा? शिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची… शिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है! शिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला! शिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ! शिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस!’ शिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण शिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते. शिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे! शिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल. शिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला. शिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला शिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं? शिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे शिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव. शिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे! शिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे. शिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही. शिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! शिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे. शिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती. शिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच! तलहातावरी सीर घेऊनी झुंजले. शिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. शिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा शिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा! शिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा. शिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते. शिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ. शिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे. शिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत. शिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. शिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच. शिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर. शिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा…….. शिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा. शिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान! शिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव. शिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर. शिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे शिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण. शिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील. शिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी! झेड सिक्युरिटी! शिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत. शिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत शिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते शिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही. शिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही. शिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ शिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा. शिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक. शिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज… शिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे शिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह शिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच शिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव शिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन शिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश शिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली… शिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर… शिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात? शिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान शिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव शिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था. शिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे शिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप शिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच शिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले शिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच शिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण शिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली शिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन शिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती… शिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड शिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर शिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त शिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत शिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ शिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी शिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला शिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ शिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र शिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर शिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र शिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात शिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान शिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये शिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान शिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका शिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार शिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड शिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी शिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा? नव्हे, यमराजाची पाठच! शिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा शिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व शिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती शिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र शिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य शिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप शिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली. शिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे. शिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा. शिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा. शिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन शिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास. शिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना शिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच शिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा. शिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा. शिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे. शिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच. शिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा . शिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले… शिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान. शिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे. शिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक. शिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड. शिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना . शिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती. शिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी. शिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर. शिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे. शिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास . शिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा. शिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक. शिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ. शिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस. शिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते. शिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे. शिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही शिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे. शिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श शिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती शिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान. शिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व शिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर! शिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे? शिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी. शिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी शिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय शिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास शिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला शिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला शिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा शिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले! शिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’ शिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा शिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान! शिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत !