Get it on Google Play
Download on the App Store

शिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…

आग्र्याच्या दरबारात एकामागोमाग होत गेलेले अपमान आणि त्यातल्यात्यात आपल्या सामनेसामने एका पराभूत जसवंतसिंहाचा केलेला सन्मान पाहून महाराजांना आपला अपमान अतिशय असह्य वाटला. ते रागाने लाल झाले. रामसिंगला त्यांनी तिथल्यातिथेच दरडावून विचारले , ‘ हा सारा कसला प्रकार चालविला आहे ? अपमान! याच्यापेक्षा मृत्यू परवडला. मी मराठा आहे.

हे मी सहन करणार नाही ‘ आणि महाराजांनी एकदम दरबाराकडे पाठ फिरविली. शंभूराजांसह ते झपझपझप आपल्या जागेवरून वळले आणि शाही सरदारांच्या मागच्या बाजूस गेले. संतापामुळे त्यांना जरा चक्कर आली. ते जमिनीवरच बसले. दरबारात एकच खळबळ उडाली. खळबळ म्हणजे कुजबुज. अत्यंत अदबीने बादशाहाची आदब सांभाळीत आणि महाराजांच्या बेगुमान , उद्धट , रानटी वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत ही कुजबुज उर्फ खळबळ चालू होती. ज्या दरबारात शिंक आली तर ती सुद्धा अत्यंत अदबीने शिंकायची , तिथे शिवाजीराजे वाघासारखे चवताळून मोठमोठ्याने या अपमानांचा निषेध करीत असलेले पाहून हे सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते.

बादशाह मात्र शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता आणि असे जणू काही भासवीत होता की , आपण उत्तर ध्रुवावर असून , ही मराठी खळबळ दक्षिण ध्रुवावर कुठेतरी चालू आहे. त्याने अकिलखानास संथपणे फर्मावले , ‘ अकील , वह देखो , सीवाकी त्यौंरीयाँ क्यू चढ गयी है ?’ अकीलखान पुढच्या रांगेतून निघून महाराजांपाशी थोड्या अंतरावर पोहोचला. तेव्हा त्याला महाराजांचे शब्द कानी पडले , ‘ मला दरबारात उभं करता ? मी काय तुमचा नोकर आहे ? मी तुमचा पाहुणा. मला साधी खिलतही दिली जात नाही ?’

रामसिंग तरी काय बोलणार ? तोही अखेर शाही गुलामच. तो एवढंच म्हणाला. ‘ महाराज , बादशाहांची प्रतिष्ठा बिघडते आहे. आपण रागावू नका , आपल्या जागेवर परत चला. ‘

महाराजांनी हे साफ नाकारले. रामसिंग म्हणाला , ‘ महाराज याचे दुष्परिणाम होतील. बादशाह नाराज होतील. ‘

हे सर्व बोलणे हिंदीतून चालले होते. अकीलने परत जाऊन बादशाहास म्हटले की , ‘ खिलत न दिल्यामुळे शिवाजीराजे नाराज झाले आहेत. ‘ तेव्हा बादशाहाने अकीलबरोबरच नवीन खिलतीचे ताट महाराजांकडे पाठविले. अकीलने ताट पुढे करताच महाराज कडाडले , ‘ मी तुमच्या बादशाहाची खिलत झिडकारतो. ‘

खरं म्हणजे महाराजांचे सगळे बोलणे बादशाहाला नक्कीच ऐकू जात होते. तो काय समजायचे ते समजून गेला होता. मराठी रक्त लाव्हारसासारखे उसळलेले सारा दरबारच पहात होता. मराठी रक्ताला मान खाली घालून अपमान सहन करण्याची सवयच नाही. ( नव्हती)

रानटी जनावराप्रमाणे राजे संतापले आहेत , असे अकीलने बादशाहास सांगितले. तेव्हा त्याने रामसिंगला समोर बोलावले आणि आज्ञा दिली , ‘ रामसिंग , शिवाजीराजांवर गुलाबपाणी शिंपडा आणि त्यांना मुक्कामावर घेऊन जा. ‘

गुलाबपाणी शिंपडून महाराष्ट्राचा संताप आणि अपमान शांत होणार होता काय ? रामसिंगने महाराजांना संभाजीराजांसह दरबारातून नेले. महाराजांनीही बादशाहाकडे वळूनसुद्धा पाहिले नाही. भेटून जाणे तर दूरच.

कालपासून घडत असलेल्या या सर्व अपमानकारक घटनांचा परिणाम अगदी स्पष्ट आत्ताच दिसत होता. तो म्हणजे ज्या हेतूने मिर्झाराजांनी हे शिव- औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारण जुळवून आणले त्याला औरंगजेबाने सुरुंगच लावला. दरबारातून मुक्कामावर पोहोचेपर्यंत महाराज वा रामसिंग काहीच बोलले नाहीत. पोहोचल्यावर रामसिंग एवढेच म्हणाला की , ‘ महाराज , आपण एवढं रागवावयास नको होतं ‘ तेव्हा महाराज एकदम म्हणाले , ‘ तुमच्या बादशाहास काही रीतरिवाज समजतात का , पाहुण्याशी कसं वागायचं ते ?’

मग रामसिंग आपल्या वाड्यात निघून गेला. त्याच्या वाड्याच्या विशाल प्रांगणातच अनेक तंबू ठोकून महाराजांसह सर्वांची राहण्याची व्यवस्था या छावणीत करण्यात आली होती. महाराजांचा खास शामियाना स्वतंत्र होता. म्हणजेच त्यांची राहण्याची व्यवस्था इमारतीत नव्हती , तर ती या छावणीत होती.

आपण फार अडचणीत येऊन पडलो आहोत , आता याचा परिणाम काय होणार हे त्यांना नेमके जाणवत नव्हते. झालेला प्रकार वाईट होता. पण तो सर्वस्वी औरंगजेबानेच मुद्दाम घडवून आणला होता. खरेतर औरंगजेबाचेच यांत नुकसान होणार होते. अशा विक्षिप्त राजकारणाला आणि गजकर्णाला औषध नसते. फक्त असते खाज आणि आग.

हा पहिला दिवस. १२ मे १६६६ . तो दिवस व रात्र नंतर शांतच गेली. पण सर्वांचीच मने अशांत होती. दुसऱ्या दिवशी महाराज आपल्या सर्व सैन्यानिशी म्हणजे सुमारे तीनशे मावळ्यांनिशी आग्रा शहरात फेरफटका मारावयास निघाले. एका हत्तीवर ते आरुढ झाले होते. पुढच्या एका हत्तीवर भगवा झेंडा फडकत होता. शंभूराजे बरोबर होते. ऐन शहरातून महाराज फेरफटका मारून आले. बहुदा ते देवदर्शनासही यावेळी गेले असावेत. पण तशी नोंद नाही. ताजमहाल बघायला गेल्याचीही नोंद नाही. महाराजांच्या तोंडी ताजमहालचा कुठे उल्लेख आल्याचीही नोंद नाही.

महाराज आग्ऱ्यात प्रथम प्रवेशले तेव्हा ते आणि युवराज शंभूराजे कसे तेजस्वी आणि अस्सल राजपुतांसारखे दिसत होते याचे वर्णन परकालदास नावाच्या रामसिंगच्या एका सेवकाने एका पत्रात लिहिले आहे. हे पत्र अप्रतिम आहे. त्यात महाराजांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट उमटले आहे. १ 3 मे रोजी मधूनमधून रामसिंग आपल्या प्रांगणातल्या शामियान्यात महाराजांना भेटून गेला. औरंगजेबाचे काही काही सरदार असेच भेटून गेले. हे सर्व औपचारिक पण सुसंस्कृतपणे घडत होते. महाराजही त्यांच्याशी शांतपणे बोलत होते. पण एक गोष्ट महाराजांना स्पष्ट लक्षात आली होती की , आपल्यावर बादशाहाची सक्त नजर आहे. येथून एकदम निसटून पसार होणे आत्ता शक्य नाही. पण प्रत्यक्ष आघात करून महाराजांना बेड्या घालणे किंवा ठार मारणे असे धाडस औरंगजेबाला करणे अवघडच होते.

समजा तसे काही त्याने केले असते , तर ? तर रामसिंग आणि काही थोडे राजपूत चिडले असते का ? तशी भीती तरी बादशाहाला नक्कीच वाटत होती. कारण रामसिंग हा आपल्या बापाइतकाच तुळशीबेलाच्या शपथेला बांधील होता. राजपुताचा शब्द म्हणजे ‘ प्राण जाय पर वचन न जाय ‘ असा लौकीक सर्वत्र होता. त्याची धास्ती त्याला होती. म्हणून तो भडकलेला पण वर्तनात शांत असा राहिला होता. शाही कुटुंबातील त्याची बहीण जहाँआरा , मामी , मावशी , इतर नातलग आणि अनेक सरदार ‘ तो ‘ दरबार संपल्यापासून औरंगजेबाला आग्रह करकरून म्हणत होते की ‘ सीवाने भयंकर वर्तन करून आपला अपमान केला आहे. आपण त्याला ठारच मारा. ‘ पण बादशाह कोणताही अभिप्राय व्यक्त न करता त्याला ठार कसे मारता येईल याचा विचार करीत होता. बादशाहाला आणखी एका प्रकारची भीती वाटत होती , असे वाटते.

ती म्हणजे शुजाची. बादशाहाने आपल्या भावांचा काटा काढला होता. दारा व मुराद यांना ठार केले होते , पण शुजा हा भाऊ भूमिगत झाला होता. तो सापडत नव्हता. वेळोवेळी चोरट्या बातम्या उठत की , शुजा गुप्तरितीने बंडाची तयारी करीत आहे. तो एक दिवस दिल्लीवर चालून येणार. या जरी ऐकीव अफवा होत्या तरी औरंगजेबाला त्याची धास्ती होतीच. शिवाजीराजाचे निमित्त घडून जर राजपूत सरदार या शुजाला सामील झाले तर ते फारच महागात पडेल असे स्पष्ट दिसत होते. बादशाह या संबंधात बोलत नव्हता पण तशी भीती त्याला नक्कीच वाटत होती. म्हणून शिवाजीराजाला वेगळ्या पद्धतीने खलास करण्याची कारस्थाने त्याच्या डोक्यात घुमत होती. चारच दिवसानंतर म्हणजे दि. १६ मे १६६६ या दिवशी बादशाहाने शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला! आता ?

- बाबासाहेब पुरंदरे

राजे शिवछत्रपती Shivaji Maharaj

गणेश पावले
Chapters
ते आम्ही---! शिवकालीन दिनविशेष छातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना. शिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं! शिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली… शिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा? शिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची… शिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है! शिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला! शिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ! शिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस!’ शिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण शिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते. शिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे! शिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल. शिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला. शिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला शिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं? शिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे शिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव. शिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे! शिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे. शिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही. शिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! शिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे. शिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती. शिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच! तलहातावरी सीर घेऊनी झुंजले. शिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. शिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा शिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा! शिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा. शिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते. शिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ. शिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे. शिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत. शिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा. शिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच. शिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर. शिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा…….. शिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा. शिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान! शिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव. शिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर. शिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे शिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण. शिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील. शिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी! झेड सिक्युरिटी! शिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत. शिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत शिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते शिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही. शिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही. शिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ शिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा. शिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक. शिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज… शिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे शिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह शिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच शिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव शिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन शिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश शिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली… शिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर… शिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात? शिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान शिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव शिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था. शिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे शिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप शिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच शिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले शिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच शिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण शिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली शिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन शिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती… शिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड शिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर शिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त शिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत शिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ शिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी शिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला शिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ शिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र शिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर शिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र शिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात शिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान शिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये शिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान शिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका शिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार शिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड शिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी शिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा? नव्हे, यमराजाची पाठच! शिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा शिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व शिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती शिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र शिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य शिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप शिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली. शिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे. शिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा. शिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा. शिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन शिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास. शिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना शिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच शिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा. शिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा. शिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे. शिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच. शिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा . शिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले… शिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान. शिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे. शिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक. शिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड. शिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना . शिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती. शिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी. शिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर. शिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे. शिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास . शिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा. शिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक. शिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ. शिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस. शिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते. शिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे. शिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही शिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे. शिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श शिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती शिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान. शिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व शिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर! शिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे? शिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी. शिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी शिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय शिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास शिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला शिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला शिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा शिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले! शिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’ शिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा शिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान! शिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत !