Get it on Google Play
Download on the App Store

अवदशेची कथा

एकदा काही कारणाने पार्वती सर्व देवांवर रागावली व तुम्ही सर्व जण वनस्पतिरूप घ्याल असा तिने शाप दिला. "यामुळे सृष्टीच्या घटनेत घोटाळा होईल, तरी आम्हाला उःशाप द्यावा,' अशी देवांनी विनंती केल्यावर पार्वती म्हणाली, "तुम्ही निदान अंशरूपाने तरी वृक्षांत राहावे." पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे वटवृक्षाच्या ठिकाणी शंकरांनी, पिंपळाच्या वृक्षात विष्णूंनी, पळसात ब्रह्मदेवांनी, आंब्याचे वृक्षात इंद्राने तर निंबाच्या वृक्षात लक्ष्मीने वास केला. याप्रमाणे वैशंपायन कथा सांगत असता जमनेजयाने विचारले, "पिंपळात जर विष्णूचा वास आहे तर पिंपळाला अपवित्र का मानतात?" यावर वैशंपायन म्हणाले, "समुद्रमंथनातून चौदा रत्ने निघाली, त्यात एक लक्ष्मी होती. सर्वानुमते ती विष्णूला अर्पण करावी असे ठरले. पण लक्ष्मी म्हणाली, माझी मोठी बहीण अवदशा हिचे लग्न झाल्यावर मी लग्न करीन. अवदेशेचे भयंकर रूप तसेच कलहप्रिय स्वभाव यामुळे तिच्याशी लग्न करण्यास कोणी तयार नव्हते. तेव्हा विष्णू उद्दालकऋषींकडे गेले. त्यांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांनी अवदशेचे त्यांच्याशी लग्न लावून दिले. उद्दालक अवदशेला घेऊन आपल्या आश्रमाकडे आले. पण तेथील सर्व वातावरण अवदशेस आवडेना. जिथे लोकांची पापमार्गाकडे प्रवृत्ती असते, लोक कृतघ्न व कपटी असतात, जिथे धर्माचार, होमहवन नाही, तिथे राहणे तिला आवडत असे. तसे तिने आपल्या पतीस सांगितले. उद्दालक अत्यंत सात्त्विक व शांत होता. त्याने विचार करून अवदशेला एका पिंपळाच्या झाडाजवळ बसवले व आपण आश्रमात पळून गेला.

इकडे बराच वेळ झाला तरी उद्दालक येत नाही हे जाणून अवदशा भयंकर आवाजात रडू लागली. ते रडणे लक्ष्मीच्या कानावर गेले, तेव्हा ती विष्णूला घेऊन तेथे पोचली. अवदशा विष्णूला, "मला तुमच्याजवळ राहायचे आहे' असे म्हणू लागली. तिची दया येऊन विष्णू म्हणाले, "माझा वास या पिंपळात असतो, तू तेथे राहा." त्याप्रमाणे तिने पिंपळात वास केला. देवांना खूप काळजी वाटू लागली. ते अवदशेकडे जाऊन म्हणाले, "तू तेथे राहा, पण भगवंतांना सोड. दर शनिवारी ते तुझ्यापाशी रहातील." अवदशेने ते ऐकले. तेव्हापासून पिंपळाच्या वृक्षात अवदशेला वास आहे म्हणून त्यास अपवित्र मानतात. शनिवारी त्यात विष्णूचा वास असतो म्हणून त्या दिवशी त्याची पूजाअर्चा करतात."

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
कर्णपुत्र वृषकेतूची कथा हयग्रीव अवतार बौद्धावतार हरिश्‍चंद्र वज्रनाभ राजाची कथा उषा-अनिरुद्ध विवाह यादवांच्या नाशाची कथा महाप्रलयाची कथा व्यासपुत्र शुकाची कथा मुचकुंदाची कथा उर्वशी व पुरुरवा ध्रुवाची कथा अयोध्येच्या धोब्याची कथा गाईचा महिमा दंडकारण्य उत्पत्ती कथा कर्णपुत्र वृषकेतूची कथा नृसिंह व वीरभद्र कर्णपुत्र वृषकेतूची कथा पाच पांडव व द्रौपदी कलंकी अवतार तपती आख्यान कृपाची जन्मकथा सरस्वतीची झाली नंदा रामभक्त राजा सुरथ श्‍वेतराजाचा उद्धार शिवभक्त वीरमणी रावणकथा विष्णूचे चक्र व गदा वैजयंतीमालेची कथा नंदीची कथा सांबाची सूर्योपासना प्रल्हाद आख्यान पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन शांतीचा मार्ग शंबरासुर वध पारिजात कथा श्रीवत्सलांच्छनाची कथा वृकासुराची कथा स्यमंतक मण्याची कथा १ स्यमंतक मण्याची कथा २ दशरथ कौसल्या विवाह त्रिशंकूची कथा भृगुपुत्र शुक्राची कथा कर्कटी राक्षसीची कथा जीवटाख्यान समुद्रमंथन व राहूची कथा रेणुकेचा जन्म रेणुका स्वयंवर सहस्रार्जुनाची कथा जयध्वजाचे आख्यान सौभरी चरित्र गरुडाचे गर्वहरण पराशर कथा श्रीमतीचे आख्यान कौशिकाचे वैष्णवगायन क्षुप व दधिचाची कथा श्रीरामांची सतीकडून परीक्षा शंखचूडाची कथा शिवांचे अवतार अवदशेची कथा कान्यकुब्ज नगरीची कथा भरताचे मागणे उर्वशी लोपामुद्रा सती सुकन्या नीलम आणि ऋता मैत्रेयी गार्गी सुभद्रा चित्रांगदा देवकी यशोदा