Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग १६

या प्रसंगी समर्थांनी स्वतः केलेली पद्यरचना लोकप्रसिद्ध आहे.

आम्हि काय कुणाचे खातो

तो राम अम्हाला देतो ॥ध्रु०॥

बांधिले घुमट किल्ल्याचे तट

तयाला फुटती पिपळवट

तेथे कोण लावितो मोट

बुडाला पाणी घालितो ॥१॥

खडक फोडिता सजिव रोडकी

पाहिली सर्वांनी बेडकी

सिंधू नसता तियेचे मुखी

पाणी कोण घालितो ॥२॥

नसता पाण्याचे बुडबुडे

सदासर्वदा गगन कोरडे

दास म्हणे जीवन चहूंकडे

पाहुनी सडे पीक उगवितो ॥३॥