Get it on Google Play
Download on the App Store

कोल्हापूरची लढाई

पार्श्वभूमी

शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा नोव्हेंबर १० १६५९ रोजी वध करून त्याच्या सेनेचा प्रचंड धुव्वा उडवला व काही दिवसातच अतिशय आक्रामक भूमिका घेउन अनेक किल्ले आपल्या अखत्यारीत घेतले. डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाळ्यानजीक पोहोचले व याच सुमारास अदिलशाही सरदार रुस्तमजमान मिरजेपाशी पोहोचला.

लढाई

रुस्तमजमान कडे अनेक मातब्बर सरदार होते फ़ाजलखान, मलिक इत्बार, सादतखान, याकुबखान, हासन खान, संताजी घाटगे इत्यादी व त्याचे सैन्यबळही मोठे होते. शिवाजी महाराजांच्या सेनेत नेताजी पालकर , हणमंतराव खराटे, हिरोजी इंगले, भिमाजी वाघ इत्यादी सरदार होते.

शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमणकरण्याच्या बेतात रुस्तमजमान होता. परंतु २८ डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर जोरदार हल्ला चढवला. पुर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला.

शिवाजी महाराज

Vātsyāyana
Chapters
छत्रपती शिवाजीराजे भोसले जन्म कौटुंंबिक माहिती वंशज मार्गदर्शक मावळ प्रांत शिवाजी महाराजांचे सरसेनापती पहिली स्वारी - तोरणगडावर विजय राजमुद्रा शहाजीराजांना अटक जावळी प्रकरण पश्चिम घाटावर नियंत्रण अफझलखान प्रकरण प्रतापगडाची लढाई कोल्हापूरची लढाई सिद्दी जौहरचे आक्रमण पावनखिंडीतील लढाई पुरंदराचा तह मोगल साम्राज्याशी संघर्ष शाहिस्तेखान प्रकरण सुरतेची पहिली लूट मिर्झाराजे जयसिंह प्रकरण आग्य्राहून सुटका सर्वत्र विजयी घोडदौड राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा जीवनक्रम शिवाजीचे अष्टप्रधानमंडळ शिवजयंती शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके