Get it on Google Play
Download on the App Store

कौटुंंबिक माहिती

शहाजीराजे (वडिल)

प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

जिजाबाई (आई)


जिजाबाई व बाल शिवाजी

जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.

पत्नी
    सईबाई निंबाळकर
    सोयराबाई मोहिते
    पुतळाबाई पालकर
    लक्ष्मीबाई विचारे
    काशीबाई जाधव
    सगणाबाई शिंदे
    गुणवंतीबाई इंगळे
    सकवारबाई गायकवाड

शिवाजी महाराज

Vātsyāyana
Chapters
छत्रपती शिवाजीराजे भोसले जन्म कौटुंंबिक माहिती वंशज मार्गदर्शक मावळ प्रांत शिवाजी महाराजांचे सरसेनापती पहिली स्वारी - तोरणगडावर विजय राजमुद्रा शहाजीराजांना अटक जावळी प्रकरण पश्चिम घाटावर नियंत्रण अफझलखान प्रकरण प्रतापगडाची लढाई कोल्हापूरची लढाई सिद्दी जौहरचे आक्रमण पावनखिंडीतील लढाई पुरंदराचा तह मोगल साम्राज्याशी संघर्ष शाहिस्तेखान प्रकरण सुरतेची पहिली लूट मिर्झाराजे जयसिंह प्रकरण आग्य्राहून सुटका सर्वत्र विजयी घोडदौड राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा जीवनक्रम शिवाजीचे अष्टप्रधानमंडळ शिवजयंती शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके