Get it on Google Play
Download on the App Store

नोकरीत बदल

वडिलांच्या देहांता नंतर,आईचे ,भाऊ आई,बहीण कोणीही फिरकले नाही,कारण
भेटावयास गेल्यास  मदत करावी लागेल
ही भीती.परिस्तिथी वाईट असल्या वर
जवळचे नातेवाईक सुद्धा विचारत नाहीत.
हा अनुभव आला.मोतोश्री स्वाभिमानी असल्याने तिने कोणालाही मदत मागितली
नाही.
एक दिवस वर्तमानपत्रात जाहिरात वाचली
पुण्यास रेल्वे पोलीस भरती आहे.त्याने विचार केला आपणही प्रयत्न करून पहावा
म्हणून तो पुण्यास गेला.तेथे त्याची रेल्वे
पोलीस म्हणून निवड झाली.सुरवातीस
एक वर्ष पुणे,खडकी येथे एक वर्ष.ट्रेनिंग
होते.भत्ता मिळत असे.ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर
दादर येथे नेमणूक झाली.