Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

शिवरायांचा काल संपला होता. संभाजी महाराजांचाही काल संपला होता .संताजी आणि धनाजी यांच्यासारखे मावळे काळाआड गेले होते .मुगल साम्राज्य खिळखिळे झाले होते. निजामशाही वेगाने पुढे येत होती. महाराष्ट्राला गरज होती शिवरायान्सारखे आणि शंभू राजान्सारखे सामर्थ्य असणाऱ्या मर्द मराठाची आणि असा एक पेशवा महाराष्ट्रात जन्माला आला त्याने मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखविली शहाजी राजांनी आणि जिजाबाई यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न ,शिवरायांचे स्थापन केलेले स्वराज्य. शंभू राजांनी सांभाळलेले  स्वराज्य ,शाहू महाराज्यांच्या काळात स्वराज्याचे रुपांतर मराठेशाहीत झाले त्या मराठेशाहीला संपूर्ण भारतात वेगाने पुढे नेले त्या 'श्रीमंत बाजीराव पेशवा' याची हि कहाणी.

पराक्रमाच्या बाबतीत शिवाजी राजा आणि संभाजी राजे यांच्या बरोबरीने असूनही मराठय़ांच्या इतिहासात थोरला बाजीराव पेशवा हा तसा ‘अनसन्ग हीरो’च म्हणावा लागेल. सध्याच्या मनोरंजनाच्या युगात तर बाजीराव-मस्तानी ही हिंदू पाश्र्वभूमीवरची लव्हस्टोरी म्हणून सादर केली जात आहे. त्यामुळे थोरल्या बाजीरावाच्या ऐतिहासिक पराक्रमी प्रतिमेचं प्रचंड नुकसान झालं. बाजीरावातला योद्धा झाकोळला गेला आणि एक प्रेमज्वरग्रस्त पेशवा तेवढाच सामोरा आला. मस्तानी हे बाजीरावाच्या आयुष्यातलं रोमॅण्टिक पर्व जरूर असलं तरी त्यावरून बाजीरावाला छंदीफंदी चौकटीत बसवणं अन्यायकारक होईल.