Get it on Google Play
Download on the App Store

शेवटी

काही यादव युद्धात आणि काही गांधारीच्या शापाच्या प्रभावाने आपसात युद्ध करून मारले गेले. पांडव पक्षाचा विराट आणि विराट पुत्र उत्तर, शंख आणि श्वेत, सत्याकीचे १० पुटे, अर्जुनाचा पुत्र इरावात, द्रुपद, द्रौपदीचे ५ पुत्र, धृष्टद्युम्न, कौरव पक्षाचे कलिंगराज भानुमान, केतुमान, अन्य कलिंग वीर, प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव वीर, कौरवांच्या बाजूने धृताराष्ट्राच्चे दुर्योधनासह सर्व पुत्र, भीष्म, त्रिगर्त नरेश, जयद्रथ, भगदत्त, द्रौण, दुःशासन, कर्ण, शल्य इत्यादी सर्व युद्धात मारले गेले होते.
युधिष्ठिराने युद्ध समाप्ती नंतर शिल्लक राहिलेल्या मृत सैनिकांचे (दोनही पक्षातील) दहन संस्कार आणि तर्पण क्रिया केल्या. या युद्धानंतर युधिष्ठिराला राज्य, धन, वैभव यांपासून वैराग्य आले. असे म्हटले जाते की युद्धानंतर अर्जुन आपल्या भावांसह हिमालयात निघून गेला आणि तिथेच त्यांचा देहांत झाला.

वाचलेले योद्धे - महाभारत युद्धानंतर कौरवांकडून ३ आणि पांडवांकडून १५ असे एकूण १८ योद्धे जिवंत राहिले होते. त्यांची नावे आहेत -
कौरव : कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा
पांडव : युयुत्सु, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण, सात्यकी इत्यादी.