Get it on Google Play
Download on the App Store

चौथा दिवस

चौथ्या दिवशी देखील कौरव पक्षाला भारी नुकसान सोसावे लागले. या दिवशी कौरवांनी अर्जुनाला आपल्या बाणांनी झाकून टाकले, परंतु अर्जुनाने सर्वांना मारून पळवून लावले. भीमाने तर या दिवशी कौरव सेनेत अक्षरशः हाहाःकार माजवला, दुर्योधनाने आपली गजसेना भीमाला मारण्यासाठी पाठवली, परंतु घटोत्कचाच्या सहाय्याने भीमाने त्या सर्वांचा नाश केला आणि १४ कौरव देखील मारले, परंतु राजा भगदत्तने लवकरच भीमावर नियंत्रण मिळवले. नंतर भीष्मांना देखील अर्जुन आणि भीमाने भयंकर युद्ध करून कडवी झुंज दिली.
कोण मजबूत राहिले : या दिवशी कौरवांना जास्त नुकसान झाले आणि पांडव पक्ष मजबूत राहिला.