Get it on Google Play
Download on the App Store

जीवन

महाकवी कालिदास कधी झाला आणि किती झाले यावर नेहमीच वाद्द झाले आहेत. विद्वानांची अनेक मते आहेत. इ. स. पु. १५० ते इ. स. ४५० पर्यंत कालिदास होऊन गेले असे मानले जाते. नव्या अनुसंधानाने माहिती झाले आहे की त्याचा काळ हा गुप्त काळ असला पाहिजे. रामायण आणि महाभारत अशा दिग्गज ग्रंथांच्या रचनेनंतर संस्कृत साहित्याच्या आकाशात अनेक कवी-नक्षत्रांनी आपली प्रतिभा प्रकट केली, परंतु असे अनेक अक्षत्र, तारे, ग्राहसंकुल असून देखील कालिदास नावाच्या चंद्राद्वारेच भारतीय साहित्याची परंपरा ज्योतीष्मयी म्हणता येईल. परिपक्व माधुर्य आणि प्रसाद, भावांची गंभीरता तथा रसनिर्झरिणीचा अमंद प्रवाह, पदांची स्निग्धता आणि वैदिक काव्य  परंपरेची महानता यांच्यासोबत आर्ष काव्याची जीवनदृष्टी आणि गौरव - या सर्वांचा ललित समावेश कालिदासाच्या कवितेत झाला अये. सार्वभौम कवी कालिदास विश्ववंद्य कवी आहे. त्याच्या कवितेचे स्वर देशकालाची परिसीमा ओलांडून सार्वभौम बनून निनादत राहतात. या सोबतच तो या देशाच्या धरतीतून खोल अनुरागला पूर्ण संवेदानेसाहित व्यक्त करणाऱ्या कवींमध्ये देखील असाधारण आहे. कालिदासाच्या काळापर्यंत भारतीय विचारसरणी परिपक्व आणि विकसित झालेली होती, षड्दर्शन तथा अवैदिक दर्शनाची मत-मतांतरे परिणीत स्वरुपात समोर आली होती. दुसरीकडे आख्यान, व्याख्यान आणि पौराणिक वाङमय यांचा जनमानसात प्रचार होता. वैदिक धर्म आणि दर्शन यांच्या पुनःस्थापानेचा अभूतपूर्व समुद्याम त्याच्या काळात किंवा त्याच्या पूर्वीच झालेला होता. ज्योतिष, गणित, आयुर्वेद इत्यादी विभिन्न विद्यांचा देखील चांगल्या प्रकारे विकास कालिदासाच्या काळापर्यंत झालेला होता. कालिदासाच्या कवी चेतनेने चिंतन तसेच ज्ञान - विज्ञानाच्या या सर्व परम्पारेलाम विकासाला आत्मसात केले, आपल्या समकालीन समाजाला आणि जीवनाला जवळून पहिले, त्यांचा अभ्यास केला आणि या सर्वाना त्याने आपल्या कालजयी प्रतिभेच्या द्वारे अशा स्वरुपात व्यक्त केले, जे आपले अद्वितीय सौंदर्य आणि हृदयवर्जकता यांच्या कारणाने केवळ युगानुयुगे आकर्षण बनून राहिले एवढेच नव्हे तर त्यातील अर्थ आणि व्याख्यांच्या संभावना देखील कधी चुकत नाहीत.

जगातील सर्वश्रेष्ठ साहित्यकार कविकुल गुरु महाकवि कालिदासाची गणना भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ साहित्यकारांत केली जाते. त्याने नाट्य, महाकाव्य तथा गीतीकाव्य या क्षेत्रांत आपल्या अद्भुत राचानाशाक्तीचे प्रदर्शन करून आपली एक वेगळी ओळख बनवली. ज्या कृतीमुळे कालिदासाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली, ते आहे त्याचे नाटक 'अभिज्ञान शाकुन्तलम' ज्याचे विश्वातील अनेक भाषांमध्ये अनुवाद देखील झाले आहेत. त्याची अन्य नाटके 'विक्रमोर्वशीय' तथा 'मालविकाग्निमित्र' ही देखील उत्कृष्ट नात्य साहित्याचे नमुने आहेत.

त्याची केवळ दोन महाकाव्य उपलब्ध आहेत - 'रघुवंश' आणि 'कुमारसंभव', पण तेवढी त्याची कीर्ती सर्वदूर पसरवण्यासाठी पुरेशी आहेत.