Get it on Google Play
Download on the App Store

काय आहे हा उल्लेख?

महाभारत ग्रंथात, भारतीय युद्ध एक दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना, काळ कसा वाईट आला आहे याचे काही श्लोकांमध्ये व्यास वर्णन करतात. त्या श्लोकांमध्ये कित्येक अवलक्षणे सांगितली आहेत, उदा. ‘चंद्राचा रंग तांब्यासारखा लाल झाला आहे’, त्यात एक अवलक्षण असे दिले आहे कीं ‘अरुंधती वसिष्ठाला मागे टाकून पुढे चालत आहे.’
हे मागे-पुढे काय प्रकरण आहे हे प्रथम पाहूं या.