Get it on Google Play
Download on the App Store

लोक हो...

विरोधी मत मांडायचं नाही
आपल्याच मतावर आडायचं नाही

तुमच्या धगधगत्या विचारांवर पाणी शिंपडा...
दोन-चार दिवस धुमसतील विचारांचे निखारे..
बंदीविरोधात देतील इशारे..
पण काळांतराने जुळवून घेतील परिस्थितीशी...

घटनेतली 19 वी ओळ ते टाकणार आहेत पुसून...
तेव्हाही त्यांचं स्वागत करा..खोटं का होय ना पण जरा हसून...

त्यांच्या चाली-रितींना,
हजारो-लाखो वर्षे पुराण्या संस्कृतीला,
त्यांच्या कायदे-कानूनांना,
आव्हानं द्यायची नाहीत...
नाहीतर तुम्हालाही ओंकारेश्वर पुलावर मारल्या गेलेल्या त्या इसमासारखं मारलं जाईल...

तुम्हाला जगायचं असल्यास..
त्यांचे थोर राष्ट्रवादी विचार लगेच शिकून टाका...
तुमची सदसदविवेकबुद्धी वगैरे आताच चांगल्या भावात विकून टाका...

त्यांच्या विचारातील चुका त्यांना सांगू नका,
त्यांच्या चाली-रितीतील दोष त्यांना सांगू नका...

तुम्ही विचारविरहित असाल तर तुम्हाला जगण्याची संधी आहे...
कारण इथे विरोधी विचारांवर बंदी आहे...