Get it on Google Play
Download on the App Store

पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा...

प्रवीण दवणे यंच्या “वय:वादळी विजांच!” या पुस्तकातील ‘पत्र म्हणजे काळाचा एक तुकडा’ हा लेख वाचला आणि मी पत्राचं माझ्या आयुष्यातील महत्व आठवू लागलो. दवणे यांनी या लेखात पाडगावकरांच्या एक एकावितेच्या दोन ओळी दिल्या आहेत त्या म्हणजे..
“पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा,
पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा!”


खरच पाडगावकरांनी अतिशय छान वर्णन केलं आहे. म्हटलं तर कागदाचा तुकडा आणि म्हटलं तर काळजाचा तुकडा. तसे पत्राला अनन्यसाधारण महत्व होते. ‘होते’ असेच म्हणावे लागेल कारण आता या नव्या माध्यमांच्या भाऊगर्दीत पत्र या माध्यमाला महत्व खूप कमी किंबहुना काहीच नाही. “पत्र लिहिण्यास कारण कि...” या ठरलेल्या वाक्याने पत्राची सुरुवात करून  “...आम्ही खुशाल आहोत, आपली खुशाली कळवा.” या वाक्याने समाप्ती ठरलेलीच. पोटाची भूक शमवण्यासाठी घरापासून दूर गेलेल्या लेकराला आईने पाठवलेले मायेची उब देणारे पत्र असो वा कुठल्याही वाईट मार्गाला जावू नकोस असे वसतिगृहात राहणाऱ्या एखाद्या तरुणाला/तरुणीला वडिलांचे सल्ला असलेला वडिलांचे पत्र असो किंवा मग एखाद्या प्रेमवीराने आपल्या प्रियेसिला लिहिलेले प्रेम पत्र असो... एकंदरीत काय तर पत्र नुसतं कागद नव्हते... पत्र भावना पोहचवत होता... प्रेम, सल्ला, आईची माया हे पोहचवण्याचे काम करत होता...आज मोबाइल, इंटरनेटच्या युगात याच पत्राला आपण विसरत चाललो आहोत..नाही का?.... वाईट वाटत असेल ना ता पत्रालाही कि आपण ज्यांच्या भवन एकपासून दुसऱ्यापर्यंत पोहोचवल्या ते आपल्याला विसरले... पण लोकं तरी काय करणार बदलत्या माध्यमांचा वापर करणे अपरिहार्यच असते...
असो... प्रवीण दवणेंच्या त्या लेखावरून लिहावसं वाटलं हे सारं... तुम्हालाही आठवत असतील न पत्राच्या बाबतीतल तुमच्या अविस्मरणीय आठवणी... तुमच्याही आयुष्याचा भाग असेल ना पत्र...असणारच... पण या पुढील पिढ्यांच्या नशिबात पत्राचे महत्व काहीच नसेल... त्यांच्या मते “पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडाच” पण ज्यांच्या आयुष्यात पत्राने महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या मते “पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा”